Video není dostupné.
Omlouváme se.
Farmer Marriage Problem | No Brides For Farmers| Shetkari Lagna | Marathi Podcast |
Vložit
- čas přidán 9. 01. 2024
- Farmer Marriage Problem
The Marriage Conundrum: Farmer Youth in Maharashtra
In the heartland of India, where fields stretch far and wide under the vast sky, a silent crisis brews among the youth of Maharashtra. The life of a farmer, once revered for its simplicity and connection to the land, now faces an unexpected challenge - the reluctance of Marathi girls to marry into farm life.
The issue has gained prominence under the moniker Shetkari Navra Hawa, a phrase that encapsulates the struggles of the modern farmer in Maharashtra. The agricultural heart of India, Maharashtra has been grappling with a marriage crisis that particularly affects its youth engaged in farming.
Traditionally, the union of two souls is celebrated as a joyous occasion, but for many young farmers in Maharashtra, finding a life partner has become an arduous task. The Colors Marathi show Shetkari Navra Hawa has shed light on the challenges faced by these individuals, offering a glimpse into the realities of farmer life and the hurdles they encounter in the quest for companionship.
The modern farmer in Maharashtra, often referred to as Shetkari Navra, faces a unique set of circumstances. With the agricultural landscape evolving and adopting modern practices, the youth are caught between tradition and the demands of contemporary farming. The intricate dance of balancing age-old agricultural techniques with the latest technology adds a layer of complexity to their lives.
The Indian farmer essay is incomplete without delving into the specific challenges faced by the farmers of Maharashtra. The state's youth, dedicated to tilling the land, find themselves in a predicament as potential brides seem reluctant to embrace the rustic charm of farm life. This phenomenon is particularly pronounced in Marathwada, where the scarcity of brides for farmers has become a prevalent issue.
Maharashtra's youth farmers are confronting a unique marriage problem, prompting us to explore the reasons behind the crisis. The clash between traditional expectations and the aspirations of modern women plays a pivotal role. The allure of urban life, with its conveniences and opportunities, often overshadows the rustic charm of the farmer's world.
Farmerstories from Maharashtra narrate tales of dedication, hard work, and love for the land. Yet, the question lingers - why do Marathi girls deny marrying young farmers? The answer lies in the evolving aspirations of the youth, seeking a life beyond the fields, and the challenges of adapting traditional practices to contemporary expectations.
As we reflect on the intricacies of farmer life in India, particularly in the villages of Maharashtra, it becomes evident that bridging the gap between tradition and modernity is crucial. It is a plea for understanding and acceptance, recognizing the valor of those who toil the soil to feed the nation.
In the ongoing saga of Shetkari Navra Hawa, the colors of Maharashtra's farm life become vivid, urging us to rethink and reshape societal perceptions. The journey of the Shetkari Navra is one of resilience, hope, and a plea for companionship amid the vast fields that echo the untold stories of the Indian farmer.
#FarmerYouthMarriageProblem #LifeOfFarmer #FarmersWeddingProblemInMaharashtra #ShetkariNavraHawa #ShetkariNavra #ShetkariNavraHawaColorsMarathi #ModernFarmer
#IndianFarmerEssay #MaharashtraFarmers #MaharastraYouthFarmersMarriage
#NavardevBscAgriTeaser #BscAgriMovieCast #LalChikhal #BscAgriMovieReviews #MarriageCrisis #FarmerMarriageCrisis #FarmerMarriageProblemMaharstra
#NoBridesForMarathwadaFarmers #FarmerStories #IndianFarmer #FarmLifeInIndia
#IndianVillageFarmerLife #FarmerOfMaharashtra
Farmers Marriage Problem मध्ये हल्ली वाढ होताना दिसतेय. शेतकरी (Farmer) मुलांना शेतकरीच बाप आपली मुलगी देत नाही. थोडक्यात, कुंपणच शेत खातंय अशी परिस्थिती महाराष्ट्रात (Maharashtra) पाहायला मिळतेय. त्यात मुलींकडून Shetkari navra hawa ही अपेक्षा तर धरूच शकत नाही. Farmers Marriage Problem हा विषय आज ऐरणीवर आला असून, चक्क Navri milena Navryala म्हणत आंदोलने, मोर्चे निघाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आधीच पाण्याचा दुष्काळ असलेल्या विदर्भ मराठवाड्यात तर मुलींच्या पालकांनी No brides for Marathwada farmers अशीच खूणगाठ बांधली आहे. Shetkari navra नेमका का नकोय? पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रज्ञान वापरुन Modern farmer होऊन Farmers Marriage Problem सुटेल का? येणाऱ्या काळात Maharashtra Farmers अविवाहितच राहतील का? Farmer marriage crisis या विषयावर Shri. Anand Shitole यांच्याशी मुद्देसूद चर्चा या Marathi Podcast च्या माध्यमातून केली आहे.
Credits:
Guest: Shri. Anand Shitole
Host: Palash Hase & Ajinkya Datir
Creative Producer: Anniruddha Sonawane, Adesh Raut
Editor: Amol Madur
Interesting माहिती मिळवण्यासाठी आणि महत्त्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी Real किस्सा ला subscribe करा.
/ @real_kissa
आम्हाला social media वर follow करा:
Instagram: real_kissa?igsh...
X: real_kissa?t=dO8m...
Facebook: m. profile.php/?i...
संपूर्ण व्हिडीओ मध्ये या विषयावर विस्तृत चर्चा केली आहे. तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा: czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=3XmmxhTezd86To64
@DattatrayPathade-if6rx😅😅
😊 3:42 @DattatrayPathade-if6rx
Ho dada kharach ahe he
Shetkarya, ne, kay, tujhi, gand, jhavaychi,
ज्या शेतकरी मुलाच लग्न करायच असेल त्यांनी स्वतः च्या बहिणीला शेतकरी मुलाला देउन साट लोट करावा......स्वता च्या बहिणीला नोकरदार, शहरात राहणार बघणार...स्वता पहिला शेतकरी मुलाला मुलगी द्या आणी त्यांच्यातिल मुलगी करुन घ्या.
Good
माझा पण हाच विचार आहे.
मुलींना फार्महाउस चालत पण फार्मर चालत नाही
अगदी बरोबर शेतकऱ्यांनी आपली मुलगी शेतकरी मुलालाच द्यायची म्हणजे शेतकरी जे पिकवील ते फक्त शेतकरी असल त्यालाच विकायचं थोडक्यात नोकरदार मध्यम वर्गीय लोकांनी त्यांच्या मुली नोकरदार आणि व्यावसायिक मुलांना च द्या शयची
बरोबर बोले साहेब
ज्या शेतकर्यांना एकच किंवा दोन मुलं आहेत मुलगी नाही त्यांनी काय करायचे
आणि हो आणखी एक गोष्ट माझ्या बहिणींची लग्ने सुदधा शेतकरी घरातच झालेली आहेत पण त्यांचे मिस्टर निर्व्यसनी आणि उत्तम प्रकारे शेती करत असल्यामुळे माझ्या बहिणी अगदी सुखात आहेत
क्या बात है! तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं विशेष कौतुक! 😊👏🏼
खूप छान.
खूप खूप शुभेच्छा
@@real_kissa आभारी आहे, पण प्रत्येकानेच जर परिस्थितीचा विचार करून आपल्या मुलींची लग्न कर्तृत्ववान आणि निर्व्यसनी, कष्टाळू वृत्तीच्या मुलांना देऊन त्यांना आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दयावे ! आणि तसेही आज अशी भरपूर मुले आहेत त्यांनी शुन्यातून विश्व निर्माण केले आहे, आणि अशा ही मुली आहेत ज्यांनी उच्चशिक्षण घेऊन, नोकरी करून आपल्या नवर्याला देशोधडीला लावल आहे !
अगदी बरोबर.
Aaj kal nirvyasani Ani mehnati mulanchech lagn hoinat ...Karan sheti karto
प्रत्येक मुलीच्या बापाला वाटते की आपली मुलगी सुखात राहावी आणि त्याला हे ही माहिती आहे कीं शेतकरी सुखी नाही तर तो आपल्या मुलीला काय सुखात ठेवेल जर शेतकरी सुखी असता तर ही वेळ आली नसती
खरं बोललात. शेतकरी सुखी झाला तर त्याचे लग्नं होतील. मुलगा आणि मुलगी दोघेही सुखाने संसार करू शकतील. czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
एकदम बरोबर शेठ?.....
शेती विरोध धोरने याला जबाबदार सरकार यावर उपाय स्वामीनाथन आयोग शेती साठी लागू करावे
😂
Apn brobr bolta svaminathn ayog kiti dvs jaletri tyaprmane bjar nahi nvinayog nemava
Somonathn ayog juna ahe. Nvin ayog hava ahe
Aple smprk kse
Chhlsvishy ahe. Cam. Cru adres fon crupacrun dya
दादा शेती सारखा मणाचा मोकळा व्यवसाय नाही पण व्यवसस्था वेवस्तीत नाही त्या वेवसायला सगळया बाजुन पोखरुन खाल्ल आतेय .शेतकरी कोणकोणाशी लडणार म्हाणून शेतकरी सुद्धा शेतकऱ्यांला मुलगी द्यायला नाही म्हणतोय.आजून खुप बोलण्यासारखे तशी मानशीकता ना सरकारची ना इतर कोणाची
खरं बोललात! 😶
शेतकरी ला मतदान साठी उपयोग केला जातोय , व पुढारी नुकसान करत असतो.
शेतात कष्ट करावे लागतात, शेण भरावे लागते आणि मुली मुलांच्या पेक्षा जास्त शिकलेल्या असतात म्हणून शेतकऱ्यांना कोणी मुलगी देत नाही. हे वास्तव आहे
@@real_kissasheti wikun shok Pani karychi ahe mulinia lagal tar particular samaj mula sobat firatat Ani zopatat suddha hi paristhiti ahe
बरोबर आहेत बरेशे मुद्दे.. ज्यावेळी शेकऱ्याचा मालाला चांगला भाव मिळेल त्यादिवशी चित्र वेगळ असेल.. आजून थोडी वर्षे नंतर शेतकरी लोकांनाच चांगले दिवस येणार आहेत
नक्कीच शेतीला चांगले दिवस येतील. त्यासाठी प्रयत्न करू! 😊
❤❤
शेतकरी पोरांची लग्न झाली नाही तर भविष्यात अन्न अन्न करून टाचा घासून मरावं लागेल ध्यानात ठेवा. शेतकरी पोरांची लग्नच नाही झाली तर ते कोणासाठी कमवतील? स्वतःला लागेल तेव्हडचं पिकवतील आणि मजेत राहतील.
आम्ही याचसाठी हा विषय पॉडकास्टसाठी निवडला. शेतकरी टिकला तर शेती टिकेल, शेती टिकली तर आपण सगळे. आपण ज्याला जगाचा पोशिंदा म्हणतो त्याचे हे हाल बघण्यासारखे नाहीत. शेवटी आपल्या सगळ्यांचं मूळ शेतीतच आहे!
प्रत्येक वेळी शेतकऱ्यांचे काय?
Kahi vishay nai honar bhau, anna kami padla ki anna-dhanyachi kimmmat vadhnar. Bhandwaldaar aplya bakkal paishachya jivavar kavdi mol jamin gheun america sarkha total mechanisation kartil. Ek matra hoil, anna dhanyachi kimmat evdhi vadhel ki naukari karnara radnar 😂😂
😂😂😂
Wadhudet
शेतकर्यांचे सुख सरकारने हिरावुन घेतलं आहे शेतकरी लुटकरणे व जनता फुकट जगणे हे धोरणं सरकारी
इयक सांगण्यापेक्षा जर शेती मालाला भाव मिळाला कीं सर्व प्रॉब्लेम सुटतील
आज महागाई पाहता 20 वर्ष अगोदर कापसाला जे भाव होते तेच आजही आहे यावर बोला महागाई किती वाढली यानुसार शेती मालाला भाव वाढवा❤
नक्कीच. शेतीला शाश्वत उत्पन्न मिळालं की चित्र बदलायला सुरुवात होईल. याबद्दल आमहो चर्चा केली होती. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा. czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
हम्म माझं म्हणणं हेच आहे आज चड्डी पासून बिडी पर्यंत भाव वाढले
साहेब तुम्ही बरोबर मार्गदर्शन करतात पण विदेशात शेतकऱ्यांना शासन मदत करतात मोदी नी शेतकर्यांचे कंबरड मोडले आहे.
karan shetkari 2000 vr samadhan manat ahet
कांग्रेस ने तर या अगोदर लखोनी पैसे दिले वाटत तुला
शेतऱ्यांसाठी कृषी कायदा केला होता तो मागे घ्य्याला सरकारला भाग पाडले, मग आता शेतकऱ्यांचे जीवन मान उंचावले पाहिजे होते ना.
मोदींच्या आधी शेतकरी सोन्याच्या चमच्याने जेवण करत होता?
मी कोणाचाही राजकीय समर्थक नाही फक्त उचलली जीभ लावली टाळ्याला हे पटत नाही
Sarkh modi modi karache pahilya sarkarne Kay dive lavle hote😂😂
100% बरोबर बोले सर तुम्ही 🔥🔥
मी पण एक ग्रॅजूएट शेतकरी आहे, शेती व्यवसाय तोटेदायक आहे यात तूम्ही अपेक्षा मारूण जगण्यापलीकडे काहीही करू शकत नाही, म्हणून मी पण माझ्या मूलीच्या लग्णाच्या वेळी हा विचार नक्कीच करणार, खिशात पैसे असल्यावर मी पण तूमच्यासारख्या मोठ्या मोठ्या गप्पा हाणू शकतो
पिकाला fix भाव मिळाला तर सगळ्या समस्या संपतील।
@@user-qh1sm3uw7u जगात कांद्याला मागणी आहे सरकार ने निर्यात बंदी केली मग यात शेतकऱ्यांचा तोटा होत आहे।मागणी असून आपण पुरवठा करत नाहीये।
शेतकरी संपला पाहिजे ही सरकारी खाजगी क्षेत्रांची धोरणे...... 😭😭😭😭😭
शेतकऱ्यांच्या मुलांनी लग्न न करण्यापेक्षा शेतकऱ्यांनी शेती करण्याचे पाच वर्षाकरिता सोडून द्या व स्वतःला लागेल इतकंच अन्नधान्याची शेती करावी अर्थात पेरणी बंद आंदोलन करा व तेव्हा स्वामीनाथन आयोग लागू होऊ शकतो
हे सर्व आपल्या हातात आहे परंतु आपली एकजूट नाही
😂 लग्न म्हणजे मुलींची आणि त्यांचा आईबापाची मागणी अशी की बदकाच्या बोच्याला मोराचा पिसारा लावण्या सारख्या अपेक्षा
खरे आहे 💯
अगदी बरोबर आहे
😂😂😂
छोटया मोठ्या प्रत्येक शेतकऱ्याच्या प्रत्येक शेतीमालाला हमीभाव जर जाहीर केले तर मला वाटते भारतीय शेतकरी नोकरदारापेक्षा जास्त कमाई करून दाखवू शकेल
मा झ शिक्षण एम ए पर्यंत आहे.पण मला शेती करण्याची खूप आवड आहे पण माझी सासू-सासरे मला शेती करू देत नाहीत असं कसं म्हणता की तुम्ही शेतकऱ्याच्या मुली शेतीमध्ये काम करत नाही किंवा शेती करत नाही.
खरोखरच खूप मोठा प्रश्न आहे.
तुम्ही जे काम करत आहे ते महत्वाचे आहे.
मी स्वतः आपल्या साथ देणार आहे.
धन्यवाद! खूप खूप आभार! नक्की आपल्या दोस्तांसोबत, पाहुणे मंडळींसोबत share करा.
मुलगी ज्या घरात सून म्हणून जाईल त्याच घरातील मुलगी सून म्हणून आपल्या घरी आणांवी. सगळे मुलगा जलमला आला की बास आता मुलगी नाहीच म्हणून एक मुलगा आणि मुलगी असावी मग वरच सूत्र जमेल.....🎉
गरीब लोकांचा विचार करा
जे भूमिहीन आहेत
नोकरी चाकरी , मजुरी, वडापाव , चहा टपरी वर लेकर जगवतात
झाली तुमची हौस आत्तापर्यंत
दिवस बदलले
शेती वाल्याला शेतीवाले पोरी देईनात
इतक्या दिबस मजा मारली की तुम्ही लोकांनी
कधीतरी तुमचे वंशजा कडे जमीन होती . ती सांभाळली असती तर ?
खर बोलतील काय फरक पडतो अशी अपेक्षा नाहि पण शेती उत्तम आहे आणि राहणार कारण 1 जर एक पिढी नोकरी करत आहे पण त्यांचे आपत्य किंवा मूल नोकरी करेलच असे नाहि कारण मुलांची वाढलेली स्पर्धा वाढलेली लोकसंख्या त्यामुळे पुढील पिढी नोकरी नोकरी करेल असे काही निश्चित नाही त्यामुळे शेती उत्तम आहे आणि पुढच्या पिढीला एक विमा पॉलिसी नुसार आहे त्यामुळे शेतकरी राजा आहे आणि भविष्यात राजा राहणार यात काही शंका नाही
खर आहे
Brobr BJP ne deti toyyat neli muli kmi ahe tr naukrdar mulala ha problem nahi
मुली कमी आहेत म्हणून त्याच्या इच्छा वाढल्या. जर कधी सम प्रमाणात असत्या तर प्रत्यकचे लग्न झालं असत
मुलगी शिकली मग ती शेतकऱ्याशी लग्न का करेल 😂शिकून समजतं नाही
आजच युग खूप खराब आहे मुलीचे लग्न करतांना सर्व गोष्टी पाहा.
पण मुलगा संस्कारी मिळाला तर काहीच बघू नका सरळ लग्न करून द्या. कारण तो मोलमजुरी करून सुद्धा पोट भरू शकतो आणि समाधानी राहू शकतो. आणि हो तो आपल्या बायकोला सुद्धा आयुष्यभर सुखी ठेऊ शकतो. आज प्रत्येकजण सर्व गोष्टी असून सुद्धा मानसिक विकाराने त्रस्त आहे🙏🙏😊😊😊😊
हा गोष्ट खरी आहे की पुरूष प्रधान प्रथा लैंगिक आकर्षणातून झाली पण आज त्यामध्ये बदल झाला आहे पण यातून स्त्रीयानी नविन विकास साधायला पाहिजे होता पण त्यांच्या कामगंध छळामुळे नवीन युवा वर्ग जेरीस आला आहे त्यामुळे सर्वच युवा वर्गाने लग्न न करण्याची योजना आखली पाहिजे
शेती या साठी पाहिजे की, उदया जर नवरा मेला तर पुढ काय? मुलीने कस जगाव म्हणून तो एक प्रकारचा विमा असतो.
विमाच तसे मिळतात की जरी नवरा मेला तरी चालू शकते आणि दुसरं लग्न होतात आजकाल... पहिल्या नवऱ्याच्या अपत्याला स्वीकारून...
🤣🤣🤣🤣🤣
अधिकारी नेमायचा
सर नमस्कार तुमचा मुद्दा बरोबर आहे दुसरी बाजु राजकीय नेते मंडळीचि निच मानसिकता शेतिमालाचे भाव पाडायचे हा मुद्दा नाही मांडता आला सत्य का सांगत नाही
याबाबत आम्ही पुढील भागात बोललो आहोत तो नक्की बघा- czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
जर राज्यकर्ते तुमच्यासारखे राहिले तर खरोखर शेतकरी सुखी होईल धन्यवाद
खरोखर तुम्हाला शेतकऱ्याच्या भावना कळतात
अगदी बरोबर आहे सर
Ekdum barobar aahe he
यावर उपाय म्हणून एकच आहे,
की शेतकऱ्याने फक्त स्वतः साठीच जगावं आणि कडधान्ये आणि भाजीपाला पिके ही कमी प्रमाणात पिकवून शेतकऱ्याने शेतकऱ्यांसोबत देवाण घेवाण करा आणि इतर पिके जसे कापूस कॉन्ट्रॅक्ट farming मध्ये medicinal plants ची शेती करा..... तेव्हा कदाचित हमी भाव व शेतकऱ्याची किंमत कळेल....
चांगला अभ्यास करा
शेतात यांत्रिकीकरणामुळे फारसं काहीही जास्त 12 महिने काम राहिलेलं नाही फक्त हार्वेस्टर वर काढणी होणारे पीक घेतले पाहिजे बैलाची सुद्धा जरूरत छोट्या ट्रॅक्टर मुळे राहिली नाही. छोटे ट्रॅक्टर कुंडली करून देतात फवारणी करून देतात पेरणी करून देतात मोठे ट्रॅक्टर कॉन्ट्रॅक्ट बेसवर उन्हाळी कामं करून घ्यायची असतात
खरंच आहे
शेती माला ला हमी भाव मिळाला तर शेतकरी ना पण मुंली आपोआपच मिळतील
खरंय! पूर्ण एपिसोड नक्की बघा, त्यात आम्ही हेच बोललो आहोत आणि प्रतिक्रिया कळवायला विसरू नका- czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=KAuj4WiuyTbzcoxa
पण शेतीमाल ल भाव मिळाला तर, वस्तू महाग होतील. आणि शहरात राहणारा सर्व समाज हा middle class aahe हा गैरसमज दूर करा. शहरा मध्ये 60 ते 70% समाज हा कामगार मजदुर आहे. ज्यानं की पगार 20 ते 25000 भेटते आणि असे लोक रस्त्यावर येतील. आणि ह्या लोकांना रस्त्यावर नाही आणायचे म्हणून शेतीमालाला भाव मिळत नाही. कारण हीच ती 60 ते 70 टक्के लोक आहे जे गावाकडून शहरात मजदूर म्हणून स्थलांतरित झाले आहेत. आणि प्रत्यक्ष रित्या हे एमआयडीसी मध्ये काम करून मोठमोठ्या उद्योजकांना मोठे बनवतात तुटपुज्या पगारावर. आणि सरकार हे मोठमोठे उद्योगपती चालवतात, ते त्यांच्या फायद्याचे rules लावणार ना.
बरोबर सर 🙏🙏
You right speak sir on this subject
अगदी महत्वाचा मुद्दा हाताळला आपण वास्तव परिस्थिती मांडली शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव हा एकमेव पर्याय आहे
बोलायला बर वाट ऐकालाही बर वाट सुरूवात कोणी करणार नाही तुमच्या सारखी अशी सुंदर भाषण ही देता आमच्या कडे लोक आजू बाजू चईपण ते स्वत: पासून सुरुवात करणार नाही दुसर्यांना अक्कल शिकवणार
तुम्ही काही नाही केले ना तर होऊन होऊन काय होईल नवीन परिणामाला सामोरे जावे लागणार
सर तुम्ही सत्य गोष्ट सांगितली
Punjab haryana madhe hotat shetkarya che lagna.. problem marathi mulinchya chya mentality madhe ala ahe
सबंध समजात जागृती घडून यावी लागेल 👍
आता तर काय भटांच्या पोरांना पण पोरी मिळेनात.... 😢😢😢
@@mangeshdimble3870 Maharashtrat Bhat urlay kuthe ...to mela..or pardeshi gela
😂😂@@mangeshdimble3870
एकदम बरोबर आहे
Barobar ahe sir tumche 🎉
हा खूपच गंभीर प्रश्न आहे;जर हा प्रश्न असाच वाढत राहिला तर न लग्न करणाऱ्या लोकांची संख्या प्रचंड वाढेल अन त्याचा लोकसंख्या व अर्थ व्यवस्थेवर विपरीत परिमाण होऊ शकतो
कोटी.कोटी.धंनेवाद.सर
बरोबर आहे सर
Right💯💯💯💯
बरोबर आहे. दादा❤❤
बरोबर आहे
नाही पटल 15 वर्षा पुर्वी मशी सांभाळणार सुद्धा सुंदर मुलीची अपेक्षा करीत होता
मुलींच्या अपेक्षा किती आहेत ते पण सांगा की
Satya paristhiti aahe saheb !
एकदम सत्य
आता शेतकऱ्यांनाच्या मुलांनी राजकारण आणि त्यांच्यामागे न पडता चांगले शिक्षण घेऊन शेअर्स मार्केट चा अभ्यास व्यवसाय करतांना एखाद्या जुन्या व्यवसाय करणाऱ्या दुकानात एक दोन वर्षे अनुभव घेऊन छोट्या भांडवल वर व्यवसाय सुरु करावा तोही मन लावून पण मित्र आले चालले इकडे चालले तिकडे अस करून जमणार नाही तुम्ही अवश्य मित्रांना वेळ द्या व्यवसायचे नियोजन करून आणि राष्ट्रीयकृत बँक मध्ये आपले व्यवहार चांगले ठेवा जेणेकरून पुढील काळात व्यवसाय ला मदत होईल ,आपले कुटुंब ,भाऊबंद ,पाव्हणे यांच्याशी नातेसंबंध चांगले ठेवणे बाकी फालतू उदयोग च नको मग बघा काय बदल होतो तो
तरुणांनी असा विचार केला तर नक्कीच बदल होईल. पण समाजाने तरुणांना योग्य दिशा दाखवायला हवी तसेच सरकारने यादृष्टीने पूरक वातावरण तयार करायला हवं. याबाबद्दल आम्ही बोललो आहोत. बघून प्रतिक्रिया नक्की कळवा.
czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
एक नंबर कंमेंट केली सर
❤
शेतकरी मुलगा आहे गावाकडे नोकरीला असेल पण अपेक्षा पुणे मुंबई इ. शहरात नोकरी ला असावा किंवा सरकारी नोकरी असावी अशाही अपेक्षा आहेत.
Khup chngle vichaar mamdle saheb😢😢
अगदी खरे सर
धन्यवाद 😊🙏🏻
एक दिवस शेतकऱ्यांचे येनार आहे
पहीले अनाज भरपुर असायचे पण पैसा मिळत नव्हता आता पैसा भरपुर असेल पण
अनाज मिळनार नाही कारण लोकसंख्या वाढत आहे शेती कमी होत आहे
तेव्हा शेतकरी हा राजा असेल
Ekdam barobar ahe pan kay karych
Super
अगदी बरोबर बोललात
शेतीच भवितव्य धोक्यात येणार आहे. सगळेच शहराकडे गेल्यावर काय होईल ?
मग बळीराजा चे राज्य येणार!
नीट अभ्यास करा आधी, शेती बंद जरी झाली तरी काही फरक पडला नाही, पडणार नाही..मी एक शेतकरी आहे.., फरक पडणार असला असता तर अशी अवस्था आमच्या शेतकरी ची असली नसती
यशवंतराव तुमच लग्न झालेले दिसतय. शेती जर पिकली नाही तर खाणार काय?विचार करा.
@@ankushekal5808 मार्केट मदे 1800 रूपे quintal गहू मिळतंय, 100 रुपे किलो तेल मिळते, स्वतः बटाटे कांदे आयात केलेलं मिळतंय... मग आपल्या शेतकरी राबून गहू पिकवतो एकरी खर्च येतो 18000 आणि उत्पन 8 quintal × 2200= 17,600 ...मग आयात केलेलं तर डायरेक्ट 18000 1700 ला मिळतंय अडत्याना same परिस्थिती डाळी, कांदा, धान्य, वाटाणा तर 95 टक्के आयात केलेल, मग मला सांगा शेती का करावी..? ज्वारी बाजरी तर शून्य रपये नफा... यात शेतकरी नि न पिकवलेलं च आहे, सगळं बाहेरील देशातील corporate शेतीचेच शाश्वत पुरवठा होतोय, आणि मी एक न लग्न झालेला शेतकरी आहे, तर लग्न झालेंवर माझ्या गरजा शेती अजिबात नाही पूर्ण करणार, कांदा बटाटा तर स्वतः शेतकरी ची हमाली सुद्धा निगत नाही
@@ankushekal5808 आणि ऊस शेतीच म्हणाल तर सगळं खर्च येतो 60000 एकरी आणि light बिल च येते 20 25 हजार इथंच झाले 80 85 हजार 60 टन × 2700 = 162000 वजा 80000 = 82,000 आले पण यात पीक 16 17 महिने गेले, आणि पैसे हातात यायला 2 वर्ष गेले आणि त्यात ही काटा मारी, ऊस तोडणी कामगार एकरी 8 9 हजार घेतले शिवाय तोड करत नाही, ट्रॅक्टर अडकला तर jcb वाला एक वेळस 2000 घेतो ते वेगळंच आहे
Barobar sir
You r right sir
नोकरी करणाऱ्या मुलाकढून पण बऱ्याच अपेक्षा इतका पगार पाहिजे स्वतःची रूम पाहिजे आई वडील बरोबर नको.
पुर्वी जातती विभागला होता समाज आणि आत्ता अर्थिक विषमता गोष्टी मुळे याला सरकार आणि वाडले ले महागई जवाबदर आहे,यात माञ मुलाची पिळून क होत आहे no one can understand pain 😞
yakdham barobar kaka
Barobar ahe sheti asun midc madhe jayla lagtay faqt lagnasathi
Problem of peasants sons deeply rooted in our religious traditions beliefs male and female should give equal treatment opportunity and daughters should be heir equality
मतांचे राजकारण शेतकऱ्यांना संपवायचं जाणिवपुर्वक धोरण आखण्यात आले अन्नधान्य शेतकऱ्यांचे तर नेते फुकटात वाटून मतांचे उत्पन्न पदरात सत्ता हातात आणि निर्सगात ढवळाढवळ झाली त्यामुळेच शेतकऱ्याला फटका बसला आणि अनेक समस्यांमुळे त्याच्या जिवनाची घडी विस्कटून अंधार 🙏🙏🙏🇮🇳
शेतकरी स्वतः शेतकरी मुलाला मुलगी देत नाही. नोकरी करणाऱ्या मुलाला घर आणि शेती नसल्यास कोणी मुली देत नाही. घर शेती आहे नोकरी आहे पण मुलगा दिसायला सावळा आहे तरी कोणी मुलगी देत नाही 😂😂😂. हा सर्व पापा की परी चा परिणाम आहे😂😂😂
शेतीमालाला न मिळणारा हमी भाव उत्पन्न वाढ होऊन सुद्धा स्वताच पोट भरू शकत नाही हे शेतकर्यांचे वास्तव आहे
शेतीला हमीभाव द्या शेतीला बाजार येऊ द्या मनासारखे मॉलमध्ये मेथीची भाजी अडीचशे रुपयाला घेणार पावशरच पण शेतकऱ्याकडून शेतकऱ्याकडून पाच अन दहाा रुपयाला मागणार कसा करणार शेतकरी शेतीकसा करणार शेतकरी शेतीकसा करणार शेतकरी शेती मग कसं कोणकोणला पोरगीगी देणार नीट सर्वेकरांना विचार करा
मी शेतकऱ्याचा मुलगा शेती सोडली सुखी जीवन जगायला फारसं काही लागत नाही 🤔
🙏जय जिनेंद्र रामराम 🙏🌹 सर्व प्रथम आपल्याला आपल्या शेतकरी असल्याचं स्वाभिमान हवं,,,अन जे शेतकय्राला निकृष्ट समजतात त्यांच्याशी नातं जोडण्या पेक्षा आपल्या मातीशी नात अटुट ठेवा,,,
आमच्या इकडे खूप अशा केसेस झाल्यात, लोकं थोडे दिवस MIDC मध्ये कामाला राहतात, मग त्याचं लग्न होते, गहु, बाजरी, अन्नधान्य सगळं गावावरूनच पुरवतात तरी पण थोड्याच दिवसात त्यांचे लय हाल व्हायला लागतात, आणि मग ते चार सहा महिन्यात पुन्हा गावाला 🐎🐎रोंग्या/पोबारा करतात. आणि पुन्हा मुख्य 🌾🌱🍇व्यवसायाकडे येतात.🙏🏻😆😅😂🤣🤣
सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी रसातळाला गेला आहे आणि त्यामुळेच शेतकरी म्हणतो की आपले हाल झाले कमीत कमी मुलीचे तरी होऊ नयेत.त्यामुळेच शेतकरी पुत्राला मुलगी मिळणं दुरापास्त झाले आहे. यामुळेच सरकारचं ढिसाळ नियोजन अप्रत्यक्षपणे या गोष्टीला जबाबदार आहे
खरच छान बोलले तुम्ही.....पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतीला प्रतिष्ठा मिळेल असा व्यवसाय करण्यासाठी जो platform पाहिजे तो उपलब्ध करून देण्यासाठी नेमक कोण कुठे कमी पडतंय... काहीच कळत नाहीये😢
पण परिस्थिती मात्र खूप गंभीर बनत चाललीय.....आणि ज्या दिवशी शेती धोक्यात येईल त्या दिवशी संपूर्ण जगाची वाटचाल ही विनाशाकडे होईल हे नक्की.....🙏
True!!
शेतीमालाला भाव नाही .सरकार शेतकऱ्याचा विचार करत नाही.शेती करायला परवडत नाही खर्च जास्त उत्पन्न कमी म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली स्वामिनाथन आयोग लागू करा
शेती विषयी कायदे बदलावे लागतील....
हो..काय-काय गोष्टी कराव्या लागतील यावर सखोल चर्चा संपुर्ण podcast मध्ये केली आहे. त्यावर जाऊन तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा😊👍
Ho
शेतकरीच आपल्या मुली शेतकर्याला देत नाही, आणि आपला देश शेतीप्रधान आहे पण शेतकरी अडाणी पद्धतीन करतात शिकलेल शेतकर्याच पोरग नोकरीकरीता पाठवतात आणि अडाणी कमी शिकलेला पोरगा शेती करतो त्यामुळे ना शेतीचा विकास होतो ना शेतकर्याचा, मुली चांगल शिक्षण घेतात कमी शिकलेला कींवा अडाणी पोरगा असेल तर त्यांच्या विचारांची तफावत असते म्हणून शेतकर्यानी शेती ला कंपनी म्हणुन बघायला पाहीजे शेतीच उच्च शिक्षण घेतल पाहीजे आणि शेतीत विविध प्रयोग करून शेतकर्याचा दर्जा वाढवला पाहीजे , प्रत्येक गोष्टीत रडारडी करण्यात काहीच अर्थ नाही सहानभूती काही काळा पुर्ती चांगली वाटते .
आनंद शितोडे सर, शेतकरी च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही याचे मुख्य कारण म्हणजे शासनाने शेतकऱ्यांचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतलेला आहे अगदी स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेतकऱ्यांना पाण्याचे स्रोत उपलब्ध नाही, शेतीमालाला कधी शाश्वत भाव नाही शासन शेतकऱ्यांना पूर्वीपासूनच गृहीत धरत आलेला आहे .शेतकरी आपले स्वतःचे हाल बघून शेतकरी , च शेतकरी मुलाला मुलगी देत नाही.
शासनाने शेतीमालाला योग्य मोबदला दिल्यास शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली तर निश्चितच ही परिस्थिती बदलेल .
कारण मूळ उद्दिष्ट हे आर्थिक उन्नती नसल्यामुळेच आहे
101% बरोबर
शेतमाला भाव मिळाला की या सर्व समस्या सुटतील
नक्कीच! याबद्दल सुद्धा आम्ही बोललो आहोत या पॉडकास्टच्या full एपिसोड मध्ये. नक्की बघा- czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=4V1ewxDwz_Ikv8Db
शेतीविरोधी धोरण यासाठी जबाबदार
5एकर शेती असणाऱ्या शेतकर्यांचे उत्पन्न एका सरकारी कर्मचार् या पगारा इतके असायला पाहिजे व त्या प्रमाणात वाढायला पाहिजे. तरच शेतकर् या च्या मुलाला मुलगी देतील
For boys : Focus on ur goal u will get many 😂😂😂
शेतकरी पिकवल तेच खाणार आहे कुणी मोबाईल लोखंडी रॉड, पेट्रोल सिमेंट, किंवा कुठल्याही वस्तू खाणार नाही ही मानव निर्मित शेतकर्याला आथिर्क परिस्थिती निर्माण केले आहे शेतकऱ्यांनी पिकवले नाही तर उपाशी मरतील शेती पिके बंद संपुर्ण अर्थ व्यवस्था ठप्पच उपाय संपावर गेले पाहिजे
खरं तरं साहेब शेतकरी सुखी झाला पाहिजे, त्यावेळेला आपल्या समाजात एक वेगळीच ओळख निर्माण होईल , मगच मुलीचा बाप असो वा इतर वर्गातील लोक किंवा नोकरदार वर्ग असो ..
ह्याला जबाबदार कोण असेल तर सरकार कारण सरकारचं शेती विषयक धोरण बदलतं नाही तर शेतकरी कधीही सुखी होणार नाही...!
सम प्रमाणात मुलं मुली असत्या तर सगळ्यांची लग्न झाली असती. एकही मुलगा बिगर लग्नाचा राहिला नसता. आणि शेतकरी मुलाला देखील सुशिक्षित मुलगी भेटली असती आणि चांगल्या प्रकारे शेती केली असती.
सत्य परिस्थिती
साहेब तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे परंतु मुलीची अट नोकरदार मुलगा करायचा आहे हे तिचं म्हणणं एकदम शंभर टक्के बरोबर आहे याला कारण शेतीमधील उत्पन्न शेतकऱ्यांनी किती पिकू द्या त्याचा हमीभाव नसल्यामुळे उत्पन्नाची गॅरंटी कमी आहे.
शेतीत उत्पन्न नाही.जे मिळतं त्याची शास्वती नाही. मग तरुण शेतात कशाला काम करणार.
सत्य परिस्थिती आहे
धन्यवाद! czcams.com/video/e3lMfulk5UY/video.htmlsi=50ALnQBKBg6Dsrdc
आम्ही शेती पिकून इतरांना खाऊ घालतो ही आमची शेतकरीची चूक आहे
खुप वाईट दिवस येणार आहेत, पुण्या मुंबई मध्ये 15 ते 20 हजारात काही च होत नाही .
भरकटलेल देश व भरकटलेल राजकारणी म्हणून शेतीची बेहाल स्थिती
मला वाटतं शासनाने विवाहित व्यक्तिलाच नौकरी द्यायला पाहिजे,प्रतेकाला नवरी मिळेल😂😂😂
हेचेवर एकच ऊपाय 6 महीने पुणे गाटायच लग्न करायच परत गावाकडे रिटर्न सागायच कंपनीने ब्रेक दिलाय आत्ताचा हा नवीन ट्रेड आहे