महाराष्ट्र दुष्काळ सन १९७३ | Maharashtra Drought in 1973 | कधीही न पाहिलेला original व्हिडिओ batmya
Vložit
- čas přidán 7. 03. 2021
- चॅनेल ला Subscribe करा.
Facebook - / batmya.press
Twitter - / batmya_press
Website - batmya.press
१९७३ हे महाराष्ट्राच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सलग तिसरे वर्ष होते. औरंगाबाद, उस्मानाबाद, बिड, सोलापूर, अहमदनगर, परभणी, नांदेड आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नुकसान झाले. मार्च १९७३ च्या अखेरीस महाराष्ट्र शासनाने दुष्काळ निवारणाच्या विविध योजनांवर १५०० कोटी रुपये खर्च केल्याचा अंदाज आहे. या चित्रपटात भीषण दुष्काळाने सर्वाधिक पीडित लोकांना मदत करण्यासाठी विविध अधिकृत आणि स्वयंसेवी संस्थांचे कार्य दर्शविले गेले आहे.
भारत सरकार कडून, माहिती मंत्रालय, चित्रपट विभाग.
#maharashtra
#batmyapress
#dushkal
मी आशा गोविंद पोळ १९७३ला 4 वर्र्षाची होते दुष्काळात माझी आई तळ्याच्या कामाला जायची उपासमार झाली वडील वारले हाल हाल झाले आम्ही भावंडे कसे तरी जगलो आज मी class two cha पगार घेते, अनेक गोर गरीब लोकांना मदत करते दुष्काळाने जगण्याची किंमत शिकवली ,, asha, govt medical college baramati, govt medical college ambajogai
Gret.ho.aap
Khup chhan
सर मला तुमचा नंबर द्या
Great
Khipn ka ?
हे संकलन आणि व्हिडिओ ज्यांनी तयार करून त्याच जतन केलं त्यांना खुप खुप धन्यवाद
मी भागवत बनसोडे १९७२_७३ च्या दुष्काळात मी आठ वर्षाचा होतो. मला दुष्काळाच्या वेदना आजही आठवतात.आमचं कटूंब त्यावेळी जळगाव जिल्ह्यातील पाडळी या गावी होतो. शेतकर्यांच्या केळीच्या मळ्यातील घोळात भाजी खाऊन जगलो. मी माझ्या आई - वडीलांचे ऋण विसरु शकत नाही. त्यांनी त्या कठीण काळात आम्हा सर्वांना जगवले धन्य धन्य ते आईवडील.
Aata tumcha वय kiti dada
🙏 Naman tumchya Aai wadilana ani tumhala
तुम्ही आपल्या जवळ चे पाळधी
😂१९७२/७३ कवठे पिरान सांगली जिल्हातील एक फार मोठं नावजलेलं गांव यांच गावाला आजपर्यत अनेक नावाने ओळखले जाते पिराचं कवठं खंबाळेच कवठं आणि सदा म्हदा मागंच कवठं त्ानंत हिदकेसरी मारूती मानेचं कवठं आणि आत ते कवठे पिरानं या नावानंओळखलं जातं जोतिराम पाटील यांच याचं गावात वास्तव्य होतं खूप जमिन असून सुद्धा होसाबाई पाटीलीनं या्च्या सासरे चुलतं यांनी ते जमिन बेकायदेशीर नावावर करून घेतले होते.त्याचं परेड मध्ये दुष्काळ पडला ४ मुलं २ मुली याचं हे छोट कुटूंब दुखानं व्याकूळ झालं होतं त्या काळातील आमचे वडील व चुलते बाळासो पाटील वंसत पाटील या दोन भावाच्या मुखातून ७२ च्या दुष्काळासंद्रभात मी बराच वेळ ऐकलं आहे ते आपल्या मोठ्या भावाच्या महिमा सांगतात दादा उर्फ व्याकूब पाटील किसन यां नावाचा व्य्तीने आम्हाला खूप चाकरी करून सांआळलं आहे पण ते ऐकोपा आता या कलयुगी संपला आहे त्यांचे बहीण सखुबाई थोरवत हिला मौजे वडगांव या ठिकाणी दिली आहे तर आक्काताई भंडारी नरंदे या ठिकाठी आणि एक भाउ शंकरराव त्यांच्या वागण्यात काहीचं फरक नाही.असू खूप वाईट होते वेळ खाणं पिनं नव्हतं म्हणून आमचं वडील दिवसातून चहा १० का पितात ते त्यांनी ते कथा सांगून झालेलं हाल व पराकाष्टा यामुळे चहा आणि बिडीची सवयी लागले आहे .
खरंच दादा आई वडिलांचे उपकार आम्ही कधी ही कसे ही काही केले तर फेडू शकणार नाही...🙏
तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक। यांनी ही दुस्काळाची परीस्थिती अगदी सहज हाताळली...आणी पुढे मोठ्या कष्टाने महाराष्ट्रात हरित क्रांती घडवून आणली......
True....❤
Ekach sageb naik saheb❤
@@rushikeshchavan3469 Jay sevalal❤😊
मी त्यावेळेस 19 वर्षाचा होतो धान्य चा काळा बाजाराने गुपचूप विकले जात होते ज्याच्या जवळ पॆसे होते ते घेत होते परंतु त्यावेळेस परदेशातून लाल ज्वारी एलो मिलो असे धान्य येत होते खुप कठीण काळ होता नंद्या आटल्या होत्या आमच्या गिरणा नदीत खोलवर वाळूमध्ये खड्डे खोदून त्यात लोखंडी टाक्या गाडून त्यातून पाणी काढत होते ते पण नंबर लावून वस्ती लोकसंख्या कमी होती म्हणून कसेतरी निधवले आता त्या आठवणीने डोळ्यात पाणी आल्या शिवाय रहात नाही आताच्या मुलांना पटणार नाही काहीही सांगता असे म्हणतात
पैसे देऊनही धान्य,माल मिळत नव्हता,फार दैना झाली,4/5 वर्षे.त्या आठवणीने सुध्दा आज काबीज करपत.फार मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातून पुण्या-मुंबईत स्थलांतर झाले.😢😢😢
Majhe papaa sangtaat... Me aaj 26 years chi aahe...
Vadil majhe 76 years che asnaar sadharan..vadilanchaa janma 1953 cha aahe. ..1972 chya veli vadil majhe 9th vaigre pass keli asnaar...aani majhya mummy cha janma 1972cha.....mhanun ki kay tichya vatyla surwaatch संघर्षात सुरू झाली..अजून ही संघर्षात चालू च आहे...Pn generation gap asun pn I can understand ..
फोन नंबर पाठव बोलारच आहे
Kaala baajar kon karit hote aathawa. Indiraji ni duskali kaame kadhali hoti. 100 foot maati khodun bandhara kinwa sadakewar takanyakarta ₹4 milayache.
तो दुष्काळाचे सन जरी आठवले तरी आमच्या अंगावर काटे उभे राहतात आणि जे आमचे पूर्वज होते त्यांनी किती कष्ट केले आडतील हा विचार पण आम्ही करू शकत नाही ज्यांनी हा व्हिडिओ जतन करून ठेवला त्यांना माझा सलाम कारण आमचा जन्म पडन नव्हता त्या काळामध्ये पण हा व्हिडिओ बगून आम्ही त्या दुष्काळा मिधील परस्तीती अनुभतो आत्ता
१९७२/७३ ला धान्यं आणि जनावराचा चारा मिळत नव्हता,पण पाणी मात्रं चार पाच परसावर होते, मोटेन मका,घास,बटाटे आणि गाजरं भिजवली जायची, मी पाणी धरायचो,आज ११ परस विहीरी झाल्यात पाणी नाही, ४०० /५०० फुट बोर कोरडे आहेत, पिण्यासाठी टँकरने पाणी येते, घरात कामापुरते भरपुर धान्यं आहे,रेशनची तर मात विचारू नका, तेव्हा लोक भर ऊन्हात खडी फोडत होते, आता झाडाखाली पंखे लावुन बिसलरी/ बियर पिऊन पत्ते खेळतात,कामाला माणुस मिळत नाही,४०० रूपये देऊनसुध्दां,मोठमोठे हरीनाम सप्ताह होतात,चारी धाम केले जाते,फक्त पाणी नाही
मित्रा काळानुसार difficulties वाढत जातात..एक दिवस आपल्याला ही पृथ्वी सोडावी लागणार आहे.
Mi 3rd madhe hote 8 varsachi maze bahin bhau dushakali kamala jat hote dhoghe engineeringala walchand collage la.tar ak bahin bhau wilingdonla hote gav hatnur Tasgav taluka shikshan sangali Visharambagala amachi panmalachi sheti hoti 12 bail hote panmala wakun gela.bail vikalp kahi kailasale gele maze baba radat.hote momne matra.na.ghabarata.bangari dhanda chalu thevala maka.hulaga konda vaparun bhakarichya kelyaa pan.shikshan thambwale nahi mothe bhavanene sangalitach joga lekar class madhe nokari keli amachaya.gavhache lok buliyanrifinari karat.yanchi khup madat zali gavala.sukadicha shira lasanachi amati khaun divas kadale kontahi bhedbhav nahata o sheth nnachatukada fekalanahi sukavun khat hoto 🌹☪️🚩🇮🇳🙏🙏🏻
मातीच्या धिगरावर खेळणारा मी आहे या व्हिडिओ मध्ये... माझे आई बाबा पण ❤❤❤❤ 😢😢😢😢
Br zhal tumhala tumcha pic sapadala 👌
Really???
😂
हा चलचित्र कुठला आहे
मग तुम्ही पाणी नक्कीच जपून वापरत असाल अस आम्ही मानतो
दुष्काळ चा अनुभव बापाला असल्यामुळे आता सुद्धा घरात 40 पोती गहू, ज्वारी, हरभर याचा साठा करून ठेवतात... दुष्काळ मध्ये घराचे खुप हाल झाले होते...
गावातील वयस्क व्यक्ती यांच्याकडून 1972 च्या दुष्काळाचे ऐकले होते आज तुम्ही प्रत्यक्षात दाखवले धन्यवाद
कोणत्याही मनुष्य जातीला शिक्षा देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त निसर्गालाच आहे
अगदी बरोबर . मानवाने निसर्गावर मात केली हि निव्वल कल्पना आहे .
आप कहां थे ज्ञानी बाबा 😂😂😂😂
@@anandshinde1255बरोबर मला वाटतंय तू आरक्षण घेऊन जगाला असेल ना म्हणून हसतोय
@@Mi_ekmaratha माझं नशीब तुझ्यासारखं नाही रे बाबा,,,, तुज्या माईला वाड्यावर बोलवून घोड्यावर घेतलेलेय म्हणून तुज्या डोक्यावर परिणाम झालाय ...🤪😝🤪😂🤪😝
झाकण झुल्या
पण त्यात जास्त गरीब होरपळाला जातो...
कधी कधी श्रीमंत पैसाच्या जोरावर तागून जातो...
आदरणीय इंदिरा जी च्या काळात खुप संकट येऊन गेली , या दुष्काळावर मात करत महाराष्ट्र शासनाने आणि भारत सरकारने स्वामीनाथन साहेबांच्या मदतीने हरीत क्रांती घडवून आणली ❤❤❤
Haritkranti.।। Manje bimari khukhau marat aahet lok bimari ne.।।
Taripan thatavik loka hya aapdancha upayog fakt virodhi rajkaran karnya sathich kartat
Haritkranti mhanje Cancer 👹👺
Full chemical Ani fertilizers cha bhadimaar 👹👺
Ho
Fukat raste banun ghetle amhi dagad fodli ahet rastyachya kamache, congress che sthanik netyani khup lutalay tya kalat
आज च्या पिढी ला काहीच किंमत नाही, सगळ्या गोष्टी सहज मिळतात, त्या मुळे ना अन्नाची ना पाण्याची, ना भावनेची किंमत 😢😢
Rait
Pan ka bar watat as whav changal aahe na aamachya nashib changal aahe te
@@arcreation8818 : तसं नाही फ्रेंड, माझे म्हणणे असे होते की आज च्या पिढी ला सगळं सहज मिळते, फास्ट फूड, फास्ट लाईफ त्या मुळे सहनशीलता patience नाही. Very few of you think for Others, for society. Rest of them are self centred. Save water, save soil, not to use plastic, have less carbon footprint, thinking for others, accomodating Poor's etc seldomly thought by them
आजची पीढी ही एकदम बेकार आहे गरीबी काय असते ते त्यांना माहीत नाही
Tyat tyancha dosh nahich...apan tyana vadhavtana kashachi jhal lagu dili nahi
1973 च्या दुष्काळ च्या खूप करुण कहाण्या ऐकल्या होत्या त्यावेळी, मुख्यमंत्री वसंत नाईक यांनी रोजगार हमी योजने द्वारे, पाझर तलाव बनवून दुष्कळ वर मात केली.😊😊
शेवटी काम करून च पोट भराव लागत होत सरकार फुकट फोसत नव्हत .
१९७३चा अनुभव असूनही मराठवाड्यात दुष्काळ पडतोच काही मतलबी राजकारण्यांनमूळे
मी 4 फेब्रुवारी 1973 ची आहे माझ्या आईवडिलांनी आम्हा सहा भावंडाना फार कष्ट करून सांभाळले
Mi pan 1973
त्या वाईट परिस्थितीत माझ्या आईने खूप खूप कष्ट करून
मोठया मुश्किलीने आम्हाला कुटुंबातील सर्वाना आणि
येणाऱ्या पाहुण्यांना सांभाळले. खूप वाईट दिवस होते ते.
अश्या। त्या माझ्या आईला सादर प्रणाम!🙏🙏🙏🙏🙏
असल्या उन्हातान्हात बायाबापड्या आपल्या लहानग्याला कडंवर पायाशी नाहीतर मांडीवर ठेऊन असली कष्टाची कामं करताना पाहून -हदयाचा ठोका चूकत होता बाळाला लागणार तर नाहीना.
पूढच्याला ठेस लागली तर मागचा शाहाना होतो म्हणून पाण्याचे महत्व पटले पाहिजे . 🌳झाडे लावा झाडे जगवा 🌳🙏
एवढी संकटे भोगून पण आम्हीं संपूर्ण भारतात आघडी वर आहोत..जय महाराष्ट्र ❤❤
संकट भोगले म्हणून आघाडीवर आहो
इचलकरंजी मध्ये मी त्यावेळी 10 वर्षाचा होतो त्यावेळी आमच्या गावामध्ये दुष्काळी कामे म्हणून रस्त्यासाठी लागणारी खडी फोडायचे काम चालू होते आम्ही त्यावेळी आई-वडील व आम्ही भाऊ-बहीण कामाला जात होतो त्यावेळी दिवसाला तीन रुपये हाजरी व सुकडी मिळत होती
या सर्व कमेंट वाचल्यावर त्या काळातील माणसांमुळे आजची पिढी ला थोडे तरी संस्कृती एकमेकांनची माया दिली जाते.
मि सुद्धा 1972 चा दुष्काळ वयाच्या 9व्या वर्षी पाहिला त्यावेळेस पंतप्रधान स्व इंदिरा गांधी होत्या आणि स्व यशवंतराव चव्हाण साहेब हे सुध्दा होते त्यावेळी सुकडी सातू इलो मिलो हे धान्य परदेशातून आणून जनता जगविली होती
हा व्हिडिओ माझ्या दोन-तीन दिवस फीड वर येतो होता पण आज हा व्हिडिओ पाहिला जुन्या आठवणी ताज्या झाल्या
हरित क्रांती पासून मराठवाडा आजही कोसो दुर आहे.पाणीटंचाई, वनराई, तळयाचा अभाव,लहान सहान बंधारे कमी प्रमाणात, राजकिय ईच्छा शक्तीचा अभाव या मुळे आजही बीड उस तोडणी साठी जग प्रसिद्ध आहे.केंद्र सरकार ची उदासीन भुमिका निधी खर्च न करणयाची भुमिका नाही.
खूपच रह्रदय स्पर्शी अनुभव कॉमेंट मध्ये सगळ्यांनी सांगितली आहेत.
🚩 मला आठवत सोलापूर ला 1972 साली भयंकर दुष्काळ पडला होता, त्या वेळचे जिल्हाधिकारी बट ब्याल होते त्यानी आपल्या अधिकारात सोलापूरच्या रेल्वे स्टेशन वर धान्य उतरविले होते 🚩
माझ्या वडिलांनी सुद्धा हा दुष्काळ पाहिलाय अनुभवलाय आणि आम्ही त्यांच्याकडून तो ऐकलंय तसा दुष्काळ परत कधीच नाही येवो अशी देवाकडे प्रार्थना करतो
संकटे भोगली म्हणून महाराष्ट्र आघाडीवर आहे
जय शिवराय
जय जिजाऊ
जय महाराष्ट्र
पुणे जिल्ह्यात 1973 ला दुष्काळ नव्हता पण आलेल्या पिकात व रानात ही कधी पाहिले नव्हते ईतके उंदीर मात्र झाले होते,मी स्वत: पाहिले आहे, अगदी त्यावेळच्या पुणे शहराजवळच्या गावात.
महत्वाची माहिती देणारा विडिओ पाहायला मिळाला, सरकारी यंत्रणा कामकरतआहेत ,लोकांची आर्थिकपरिस्थिती अंदाजआला
मी हा.दुष्काळ पहिला आहे माझे आई वडील खडी फोडण्यासाठी कामावर जात होते आतिष्य भयंकर परस्थिती होती माकणी ता उमरगा.जिल्हा उस्मानाबाद त्यावेळचा
मी हा दुष्काळ अनुभवलाय तेरा वर्षाचा होतो. भयानक परिस्थिती होती. खाण्यासाठी लाल ज्वारी आणि ती ही कमी. शाळेत सुकडी. रस्त्याची कामे मजुरी अडीच तीन रू. बाजारात धान्य नसे. पिण्यासाठी पाणी होते. एक लक्षात घ्या. त्या काळात बोर वेल नव्हत्या, विहिरी चार पाच परस. त्यामुळे पाणी फक्त पिण्यापुरते. शेतीत संकरित पीके नव्हती त्यामुळे उत्पादन कमी. आज संकरित बियाणे वापरून धान्य मुबलक आहे. लोक काही म्हणोत पण बाजारात पाहा, सरकार देत असलेले धान्य बाजारात मोठ्या प्रमाणात विकले जाते. मजुरी सरासरी पाचशे रू. पूर्वीसारखी कामे मजूर प्रामाणिकपणे करत नाहीत. ग्रामीण भागात चौकशी करा. आज विहिरी सत्तर ८०फूट खोल, बोर पाचशे सहासे फूट. त्याची संख्या अफाट त्यामुळे पाणी उपसा जास्त. त्यामुळे पाण्याची टंचाई पण अन्न धान्य आहे, लोकांना मिळत ही आहे. फुकट बरेच मिळते त्यामुळे प्रामाणिकपणे काम करण्याची बऱ्याच जनाची प्रवृत्ती दिसत नाही.
लाल ज्वारीला millo म्हणत होते.
एकदम सत्य परिस्थिती आहे आपण जे लिहिलं आहे ते
1972 च्या दुष्काळाचे चटके सहन करत सुद्धा आपल्या लेकरा बाळांना सांभाळले.ह्या दुष्काळा बद्दल माझ्या आजी आजोबा कडून सर्व ऐकले आहे.ऐकताना खूप वाईट वाटायचं.
बरबड्याची भाजी खाल्ली,रोजगार हमी योजनेवर मिळणारे धान्य काम संपल्यानंतर भेटायचे मग ते संध्याकाळी घरी आल्यावर घराच्या जात्यावर दळून काढायचे त्याची एक दोन भाकरी बनवून मुलं बाळांना खाऊ खालून उरलेली ते खायचे.कधी भाकरी शिल्लक राहत असे कधी नसे....😢 खूप वाईट वाटायचे आजी आजोबा हे सर्व सांगत असताना...😢
आजी आजोबा सांगितले ते सत्य आहे
मी दोन वर्षाचा होतो. माझे आई बाबा त्या वेळी जी परिस्थिती होती त्याबद्दल नेहमी सांगत असत. आज सर्वांच्या कमेट्स वाचून मला रडायला आले. माझे आई बाबा आता नाहीत पण मी मात्र माझ्या मुलांना याविषयी नेहमी सांगत असतो.
श्रीगोंदा तालुका उकडगाव आमचं गाव होतं 1972 च्या दुष्काळात गावात पाणी हाताला काम नाही त्यामुळे आमचे आजोबा वडील कामाच्या शोधात प्रवरा नदी काठी चिंचोली या ठिकाणी आलो आणि आज स्थायिक झालो आजही गावाची आठवण येते
शिवरात्रि ला यात्रा असते उक्कडगावची मुंजाबा महाराजांची येणे होते का तुमचे यात्रेला.
Chicholi gurav ka amhi devgav che
पूर्वीचे लोक मायाळू आणि इमानदार होते म्हणून सर्व लोक त्यातून सावरले गेले . पुढील काळामध्ये अशी परिस्थिती येऊ नये .
आता एकमेकाला मारून टाकतील पोटासाठी
अशी नव्हे याहून भयंकर परिस्थिती येणार आहे. तेव्हा तर ग्लोबल वॉर्मिंगच्या झळा बसत नव्हत्या. आता तर तापमान ३ अंशाने वाढेल असे अंदाज आहे. पॉइंट ऑफ नो रिटर्न आपण पार केलेला आहे. त्यामुळे बघा तशी व्यवस्था करून ठेवा
खर आहे ,माझ्या वडिलांनी पण 1972 चा दुष्काळ ची झल बसली होती ,अनेक कामे विहिरी कामे करून उदरनिर्वाह केला !🙏🙏
जुनी आठवण ही फिल्म काढण्या साठी ज्या ना परीश्रम घेतले त्या चे खूप खूप अभिनंदन व मनापासून हादीँक शुभेच्छा जय महाराष्ट्र 🙏🏅📢✍️
मी स्वता त्या वेळी साली दोन वर्षाचा होतो आम्ही सहा भावंडे पण माझ्या आई वडिलानी कसे जगवले असेल 😢😢
माझी आई त्या परिस्थितीत कसे जगलो ते सांगते. आज ती 101 वर्ष वयाची आहे. तेव्हा राजकारण असे गलिच्छ नव्हते, सरकार मायबाप होतं. शिक्षण नसलेल्या लोकांना तळं, नाला बंडींग, कोल्हापुरी बंधारे असे काम दिले. आजचं सरकार कामाहून काढून टाकतय.
सुकडी व लाल ज्वारी खाऊन दिवस काढले.नको त्या आठवणी परत😢
Zade lawa ata tari Pani tikun rahil ny tar parat ahe tech divas
खरं उआहेभावा
निळा पण खावा लागला
मिठ भाकर खाल्ली भाu
मी 1972 चा दुष्काळ ऐकला आहे आणि आता पहात आहे.
नेहा दुष्काळ ऐकला आहे आज ऐकला आहे आजची कडून आणि आज पाहत आहे आणि मला रडायला येत आहे
हे दिवस जरी आम्ही अनुभवले नसेल पण हा विडीयो बघून खरच खूप वाईट वाटले, आमची आजी या वेळेच्या गोष्टी आम्हाला सांगायची तेव्हा समजले त्यांनी एवढे कष्ट , मेहनत करून जे आपल्यासाठी ठेवले खरच त्यांचे उपकार न विसरण्यासारखे आहे😢😢
मी त्यावेळेस नवीत होते लहान भाऊ मोठ्या दोन बहीणी सर्व जन कुपनावर मिळालेल्या लाल मिलो आणि हुलगे यांच्या भाकरी खाल्ल्या आईवडिलांच्या बरोबर उन्हात कामाला जायचों खुप कठीण काळ होता तो. आता ते दिवस आठवल्या वर खुप वाईट वाटते..
मि हा दुष्काळ अनुभवला आहे. या दुष्काळत 30 एकरापैकी आमची 15 एकर जमीन फुकट भावात विकल्या गेली होती. परंतु आता 100 एकर कमावली आहे.
हरामाचा पैसा असावा,नेते मंडळीसारखा,१०० काय ५०० एकर वालेपण आहेत.दादा सद् उपयोग करा,थोडे बहुत अन्नदान करा फक्तं गरजुनां,
बर
100 एकर कशी कमावली? एक एकर 40 लाख सांगतात गावात आमच्या. मी 20 पर्यंत घेऊ शकतो
आजोबा तुमचं वय किती😂
😂
मी २री किंवा ३री ला होतो.... काही काही अजुनही आठवते... विहिरीत उतरुन वाटी वाटीने गढुळ पाणी 'मीळवने,..लाल ज्वारीच्या कडकडीत भाकरी.. घरातील सर्व माणसे तळ्याच्या कामावर जायची... सरकारी सुकडी हे माझे, आमचे खास आकर्षण होते... काहीही असो.. पण सुकडी खरोखरच पौष्टिक चविष्ट दर्जेदार असायची.... कुटुंबीयांनी आम्हा लहानग्यांना कुठलीही झळ लागू दीली नाही..!!!! जय भारत जय महाराष्ट्र सरकार ❤
बरोबर आम्ही सुध्दा
मी आदिवासी कुटुंबातील आहे माझे वडील त्या काळी रान केळीचे कंद खाऊन आपले पोट भरतं होते अस माझे वडील म्हणतात खूप भीषण दुष्काळ होता त्यांचा या कष्टाची मला नेहमी जाणीव होत असते😢
या दुष्काळाचे वैशिष्टय म्हणजे पावसाचा एकही थेंब न पडल्याने कसलीही पेरणी झाली नाही.
1972 साली महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना बाकीच्या राज्यांनी काय केलं ???? का कायम देश अडचणीत असताना महाराष्ट्रानेच पुढं पुढं यावं जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩
आता दुसरे राज्य आणि परप्रांतीय लोकांनी महाराष्ट्र जवळपास चोरलाच आहे येथील पुढाऱ्या न च्या मदतीने 🙏🙏🙏
आता सारखे पुढारी त्यावेळी असते तर जनता उपाशी संपून गेली असती
100%बरोबर, आताचे सरकार बोल घेवडे
Aagdi.brobar.sadhya.madhyachya.taluwarche.loni.khanare.pudhari.paida.zale.aahet.
धन्यवाद सर
हा दुष्काळ बघितलेला माझी आजी अजून आहे.खूप वेदना सहन केल्या त्यांनी.
त्या दुष्काळात परदेशातून आयात केलेल्या धान्यामधून वेगवेळ्या तनाचे ( गवताचे) काँग्रेस गवताचे बियानेही आलें होतें...
Tyacha kay upyog kela??
आज मी ५९ वर्षाचा झालो आहे
दुष्काळात ७ /८ वर्षाचा असेल
या काळात लोकाच्या हाताला सरकारने काम दिले
सडक
तळे पाट बांधून धरणे उभारणी केली
खडी सेंटर यांच्या माध्यमातून काम
मी स्वतः या काळात
शाळा सोडून गाई म्हशी ओळल्या
सरकारने दुजाभाव केला नाही
आज लोकांचे वागणे पाहिले की डोळ्यात पाणी येते
लोकांना
जव गहू
सुगडी
डॢम ने पाणी पुरवठा केला
लोक त्या काळात प्रेमाने एकोप्याने राहत होते
जयभीम🙏🙏🙏
जय महाराष्ट्र
माझी आई वडील सांगत होते 72चादुष्काळ अतिशय कठिण काळ होता तेंव्हा तरवट्याची नुसतीच भाजी मिठ लावून खायची व कधीकधी उपाशीच झोपावे लागायचे आमच्या आई वडील आजींना अन्नासाठी खुपच त्रास सहन करावा लागला😢😢😢😂
1971/72 अतिवृष्टी मुळे अन्नधान्याचा दुष्काळ पडला होता, परंतु पाणी व गुरांच्या चाऱ्याचा सुकाळ होता.
1972/73 मध्ये पडलेला दुष्काळ हा पाऊस नसल्यामुळे होता. पिकं/ गुरांचा चारा नसल्यामुळे लोकांना खायला अन्नधान्य नव्हते, पिण्यासाठी पाणी नाही आणि महत्त्वाचे म्हणजे गुरांना चारा मुळीच नव्हता.
त्या वेळी महाराष्ट्रात रोजगार हमी योजना राबवून सगळी कडे रस्ते, तलाव निर्मिती झाली, विदेशातून अन्न धान्य मागवून जनता जगवली गेली.
तत्कालीन नेतृत्व दूरदर्शी असल्यामुळे भुकमारी झाली नाही.
पुढील वर्षापासून संकरित बियाण्याची लागवड करून देश अन्न धान्य साठी स्वयंपूर्ण झाला.
माझ्याही मोहोळ तालुक्यातील अंकुल या गावातील जनावरे जगवण्यासाठी शेतकरी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्ये गेलेले होते जनावरांना तिथले गवत सपक लागत असल्यामुळे नेलेल्या जनावरापैकी पैकी निम्मी जनावरे मरण पावली व शेतकरी शेतकरी जड अंतकरणाने दुष्काळ संपल्यानंतर गावी परतले हा अनुभव अविस्मरणीय आहे माझे आजोबा देखील त्यावेळी पाटणला जनावर घेऊन गेले होते तेव्हा तिथले हैबतबाबा नावाचे इसम आणि सर्वांना मदत केली होती
हे देवा हे पाहून खूप दुःख झाले अशी वेळ कधीच कुठल्या देश राज्य गावावर येऊ नये 🙏🏻🙏🏻
Thanks sir
मी 11 वर्षाचा होतो. EGS चे कामावर काम करणाऱ्या मजुरांना सुकळी ( शीरा) वाटायचे काम करीत होतो.😮
मी स्वतः ७२ /७३ चा दुष्काळ अनुभवला आहे त्या वेळी कामावर सुकडी वाटप करायचे पाझर तलावांची कामे सरकारने सुरु केलेली होती .
Tya saglya sahan kelelya mansana maza pranam😢😢
I was working in this drought 2.5 Rs per day ,we suffer very much,very shortage of water food,we eat sukadi maka nilava,iwas in 10 th std ,my teacher help me in education, i can't forget those difficult drought days,
Thank you sir for predicting real condition. I was in 6th class at that time. I was involved in such type of hard work..
सर... खरच मागील किमान 100 ते 200 वर्षा पासून दुष्काळ असतो उन्हाळ्यात.....किमान महाराष्ट्रात तरी..... बऱ्याच जिल्हा मध्ये....आज आपण शून्य प्रगती केली असच म्हणाव लागेल.....आणि ह्याला आपण सुध्दा तितकेच जबाबदार आहोत.... राजकारणी तर आहेतच..
मी पण पहिला दुष्काळ मी 10वर्षांची होती मला थोडं थोडं कळत होत लाल मिलो ज्वारी मिळायची माझ्या आई दादा नि खूप कष्ट केले t
महाराष्ट्राचा साठी भयानक दुष्काळ १९७२/. १९७३
खुप भयंकर वातावरण,,, तेव्हा बारामती मधे होतो वय वर्ष 10 😢
मी❤राजेश्वरी त्या वेळी १०वषौंची होते मि ही दुष्काळ अनुभवल्या
जव् खात्यात चपाती
जुन्या पिढीने खूप त्रास सहन केला असून अतिशय कठीण दिवस काढले आहे , आपण ही तशी जाणीव ठेवून वागलो पाहिजे....
आज येवढ्या सुख सुविधा आहेत पण आज ही वडील.
म्हणतात दुष्काळ पडेल पुढील काळात त्या वेळी पाणी तर मिळत होत आता पुढे पाणी ही मिळणार नाही सरकार अन्न आणून घालेल पण पाणी कोठून आणणार
असे अडाणी लोक होते म्हणून राज्यकर्त्यांचे त्यावेळी चांगलेच फावले.आता सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही पण लोकांना आपल्या हक्काची थोडीफार जाणीव आहे, म्हणून लोक आवाज उठवत आहेत.
1972 किंवा 1973 हा दुष्काळ मि जवळुन पाहीला माझे संरबा येथील मावसा व मावशी आमच्या येथे होते
व दुसरबीड माळावर गिटी फोडण्यासाठी ते कामावर जायाचे मी पण त्या च्या सोबत जायचो मका ची सुकडी मिळत असे 🏅📢🙏🥇
मी लहान असताना हा दुष्काळ खुप जवळुन अनुभवला , आज ही ते चित्र डोळ्यासमोरुन जात नाही ,
Harder than hardest. Only Maharashtra. ❤
या वेळेस मी तीन वर्षांचा होतो मला काही दुष्काळ आठवत नाही पण ऐलो मिलु ज्वारी मी पण खाल्ली आहे सुकडी
आपले पुरवजाने फार कष्ट् केले सरव काही सहनही केले दुशकाळ ही सहन केल आणि प्रगती आपल्या पुरवजानी केलि परप्रतीय फुकट खायायला आले
आपल्या आताच्या पिडीला महिनत करायला नको फक्त 8 तासाचि नोकरी पाहिजे जेसहन केले आपल्या पुरवजानि ते आपन नाही सहन करू शकनार भविष्यात असा दुशकाळ येऊ शकतो
झाडे🌲🌳🌴 लावा तोडु नका
मी दिगंबर पोटे,रा. माळीण.. त्यावेळी सहा वर्षांचा होतो... सगळीकडे रोहयो ची कामे चालू होती... लोकांना सुकडी रवा मिळायचा... रेशनिंग कार्ड वर मका ज्वारी मिळायची... अतिशय भिषन दिवस...
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री 1972 ला शरद पवार होते
पुसटचा दुष्काळात आठवत दुसरीत होतो.प्रचंड हाल झाले असावेत. आम्ही मोठे शेतकरी कामाला जाता येईना आणि भाकरीची सोय नाही.पण दुष्काळानंतर चे हाल खुप दिवस सोसले.
परत एकदा असा किंवा या पेक्षा जास्त भीषण दुष्काळ पडायला पाहिजे.. आता खरंच गरज आहे.
मूर्ख आहात का तुम्ही
Tuzya ghari padava khavele😂😂😂😂😂
2024 ला पडणार आहे दुषकाळ
.मी 1972 ला हे काम केले.... सरकारी आधिकाऱ्याने रोजगार हमी कामात ब्रस्टाचार केला बोगस मजूरच्या नावावर पैसे कमवले
जुने लोक आठवणी सांगतात. आपल्या आजी आजोबांनी बरबड्या खाऊन पाटाचे कामं केले.😢
Video पाहूनच डोळ्यात पाणी आले, त्या वेळी लोकांनी जीवन जगण्या साठी काय काय सहन केले असेल. आपण कल्पना ही करू शकत नाही.
Great people great government
अतिशय भयानक स्थिती
लाल ज्वारी ला मिलो म्हणायचे ती ज्वारी व सुकडी खाल्ली खूप वाईट काळ होता
आज आपण किती सुखी आहोत..
स्व. इंदिरा गांधी खूप कणखर व अभ्यासू अशा पंतप्रधान होत्या त्यांच्या नेतृत्वामुळेच महाराष्ट्रा 1972 साली या दुष्काळातून सावरला. अन्यथा.......
कणखर नाही,निर्दयी होती ती बाई,खरी डाक्युमेंटरी अजून आहेत पहा,गुजरात आणि महाराष्ट्रात कित्येक जनावर पाण्याविना तडफडुन मरत होती,मी त्या वेळी अकरा वर्षाचा होतो,एकदम भयानक परिस्थितीच्या डाक्यूमेंटरि न्यूज रिल पडद्यावर दाखवत होते पण इंदिरा गांधीने त्या मधले कांही चित्रिकरण कट करून टाकायला सागितल्या,नंतर 1972नंतर ही काम लोकांना देऊन ,त्या बदल्यात अमेरिकेतून आणलेली सडकि बार्ली,व लाल मिलो ज्वारी देऊन उपकार केल्या प्रमाणे बाई वागत होती,
बाई मी धरण धरण बांधीते गं.. माझं मरण कांडीते गं...
Daya Pawar 👍
1972 because of Shrimati Indira Gandhi and her team we Maharashtra survived that time. I was 14 years old.
मला थोडासा आठवतय मि पाच वर्षांचा होतो ,शाळेत जाण्यासाठी कपडे नसल्याने मला त्या वर्षी शाळेत टाकल नाही .
माझा जन्म झाला तेव्हा 27 / 1/73 आई खुप आठवणी सांगत होते की खाण्या साठी काही धान्य नव्हते लाल ज्वारी व भेंडी अस माझ जेवण होत खुप हाल झाले होते
मी 72 चा दुष्काळ पाहिला नांही कारण दुष्काळ नंतर माझा जन्म झाला पण आमची आई नेहमी 72 च्या दुष्काळाची परिस्थिती सांगायची लाल ज्वारीची भाकरी खात असे
माझ्या वडिलांकडून ऐकलेली आहे ही कहाणी माझे वडील त्यावेळी चार ते पाच वर्षांचे होते माझी आजी बाबा मॉल मजुरी करत असत आणि त्या लेडीज लाल ज्वारी खाऊन आम्ही सर्व भावंडे वाचले आहे असे माझे वडील सांगायचे आणि त्यावेळेस त्या लालच्या वारीला जेवलीस चव होती तेवढी आता कोणत्याच धान्यातनाही
मी बघीतला हा दुष्काळ आमी दुसरबीड येथे माळावर गीठी फोडली
सुकडी मिळत असे 📢🏅🙏🥇
झाडे लावा झाडे जगवा... 🌴 🎄.. असे दिवस परत ना यावे असे वाटत असेल तर झाडे लावणे गरजेचे.. झाडे पाणी ची पातळी टीकाऊन ठेवतात..
१९७३ चा नाही १९७२ चा दुष्काळ असे शिर्षक हवे
1972 ला पाऊस झाला नाही त्याची झळ 1973 च्या उन्हाळ्यात जास्त बसली असावी
कमेंट वाचुन खूप रडायला आलं
या गोष्टी खूप ऐकल्या माझ्या
बाबा कडुन
पण आता ते सुद्धा या जगात राहीले नाही
मिस यु दादा