Quit this Habit | ही सवय तात्काळ सोडा... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai |
Vložit
- čas přidán 26. 12. 2022
- Amrutbol 972 | Quit this Habit | Habits Change your Life | ही सवय तात्काळ सोडा... - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai | Amrutbol 972
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available at: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
Linktree- linktr.ee/jeevanvidya
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplatio,n and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#habits #thinkpositive #thoughts #thoughtsforlife #positivethoughts #destiny #karma #positivity #wisdom #satguruwamanraopai #marathisuvichar #suvichar #satguru #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru #habit
आपल्याला सुखी व्हावे असे वाटत असेल तर ते इतरांसाठी मागा.सर्वांना सुखात ठेव,सर्वांची भरभराट होऊ दे,सर्वांना ऐश्वर्य मिळू दे असे मागणे मागा.म्हणजे ते सर्व आपल्याला मिळणारच ही गॅरंटी सदगुरू देतात.कर आणि पहा म्हणजे कृपा म्हणून करून बघा.
🙏
Thanks Sadguru
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, savanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
If you want to be happy try make others happy।
आपले चांगले व्हावे असे वाटत असेल तर तीर्थयात्रा, व्रत वैकल्ये, उपासतापास करण्यापेक्षा दुसऱ्याचे भले व्हावे, दुसऱ्याचे चांगले व्हावे असे चिंतन करा. कारण चींती परा ते येई घरा. म्हणून विचार बदला नशिब बदलेल....छान मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
चिंतन करना याने ईश्वर से मांगना है,क्योंकि ईश्वर शंकर कहते हैं तथास्तु।तथास्तु याने वैसा ही तू।
🙏विठ्ठल, विठ्ठल माऊली 🙏
ईश्वराने पर्यावरण, निसर्गरुपाने सर्व प्राणीमांत्राना भरभरून आनंदासाठी व्यवस्था केली आहे. सर्व प्रकारच्या समस्या, संकटे मानव निर्मित आहे. आणि त्या मानवानेच सोडवल्या पाहिजे. म्हणूनच तूच आहेस तूझ्या जिवनाचा शिल्पकार. चिंती परा ते येई घरा. क्रिया तशी प्रतिक्रिया, भाव तसा देव. Action तशी Reaction म्हणूनच विचार, कर्माच्या ठिकाणी सदा सावध. सदा सावध तो सदा सुखी.
धन्यवाद सद्गुरू राया, मातृतूल्य शारदा माई, ज्ञानगुरू प्रल्हाद दादा, मिलन वैनी सर्व पै कुटुंब तसेच संपूर्ण जिवनविद्या टीम. जय सद्गुरू, जय जिवनविद्या....
प्रार्थना म्हणून काय होत...ते...बघा..अनुभव सहा महिन्यात...सहा आठवड्यात...सहा दिवसांत पण येईल...पण प्रार्थना पोटातून आली पाहिजे...नुसती म्हणायची म्हणून म्हणू नका....O Great Satguru you god on to you 🙏🌹🙏
आपल्या चींतनाप्रमाने जीवनात आपल्याला अनुभव येत असतात. आपण जसे विचार करतो त्याप्रमाणे फळ मिळते. ते कस, यामागचे शास्त्र काय यासाठी ऐका सद्गुरुंचे सुंदर मार्गदर्शन......
विचार हा सम्राट आहे भाव तसा देव शरीर ही वास्तू आहे माणूस सवयीचा गुलाम आहे चिंतन चांगले करा प्रार्थना करा पोटातून करा
खूपच अप्रतिम मार्गदर्शन माऊली
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सांगतात मनुष्य हा निगेटीव्ह विचार करतो मनचिंती ते वै री न चिते मनुष्याने नेहमी दुसर्याचा भल्याचा विचार करावा म्हणजे तुझे भलं होईल जय सद्गुरू जय जीवनविद्या
ही सवय तात्काळ सोडा. सुंदर मार्गदर्शन .धन्यवाद माउली. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम. 👌👌👍👍🌷🌷🙏🙏🙏
सगळ्या समस्या व संकटे मानवनिर्मित आहेत. त्या दूर करण्यासाठी आपले विचार होकारार्थी व समन्वय साधणारे असले पाहिजेत तरच सर्वांचे भले होईल. सद्गुरु श्री वामनराव पै .
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
अनिष्ट सवयी आपल्याकडेच bumrang होऊन परत येतात आणि अनिष्ट परिणाम भोगावे लागतात,चिंतन सुधारा..चमत्कार अनुभवा
जगात,राष्ट्रात असणारा प्रत्येक माणूस हा अनिष्ट चिंतन,अगदी सहज करीत असतो.त्यामुळे त्याच्यावर आरिष्ट म्हणजे दुःख चिंता काळजी ह्यांचा डोंगर त्यावर कोसळत असतो.माणूस सहज दुसऱ्याची निळा नालस्ती करीत असतो .Thanks Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
प्रार्थना ही सतत म्हणायची
Vitthal vitthal deva
खरी वास्तू तुझे शरीर आहे त्यामध्ये देव आहे
हित करावे देवाचे चिंतन केले तर सर्व काही मिळेल
चिंती परा ते येई घरा l... मन चिंती ते वैरी न चिंती l..... आपण जे चिंतन करतो ते आपण देवाकडे मागत असतो... जसा तू बोलतोस तसा तू होतोस.... यालाच शंकर म्हणतो तथास्तु.... म्हणूनच अनिष्ट गोष्टी यांचे चिंतन करणे सोडणे..हेच सर्वांच्या हिताचे आहे.... अवश्य ऐकावे असेच मार्गदर्शन सद्गुरुंचे....
माऊली सांगतात तुम्ही जे चिंतन,विचार,कल्पना,भावना करता ते positive करा.आपण जे विचार करतो ते आपण देवाकडे मागतो.आपल्या मागण्या प्रमाणे देवाकडून आपल्याला मिळते. माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू .Mauli we are great full to you. 🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
धन्यवाद माऊली 🙏🏻
आपल भलं करण्याचे सामर्थ्य शुभ चिंतनात आहे.🙏🏻🙏🏻🙏🏻 सुंदर मार्गदर्शन 🙏🏻🌹🌹
Chinti para te ye ghara🙏🙏💐💐
Sadhguru Nath Maharaj ki jay vitthal vitthal vitthal sarvanna
Sdgurunchi विश्व प्रार्थना सतत,सातत्याने ,नित्य,नियमित म्हणत राहावे
Mauli thank you so much 🙏😊
" अनिष्ट चिंतन करण्याची सवय सोडा .
अनंत अनंत कोटी कोटी वंदन सद्गुरू माऊली सर्वांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांचे भले कर.जीवन विद्या सांगते विचार बदला नशिब बदलेल .
Apratim margdarshan
सतत विश्वप्रार्थनाम्हणा व अनुभव घ्या. कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🌷🙏🙏
एवढं सुंदर आणि सोप्प पुण्य मिळवण्यासाठी मार्गदर्शन फक्त सद्गुरूच करू थँक्यू सद्गुरु थँक्यू जीवन विद्या
शुभ सकाळ सुंदर विषय " सवय" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
Deva sarvana sukhat anadat thev
Koti koti Vandan Mauli Vithhal Vithal
आपल्या जीवनामध्ये निर्माण केलेल्या समस्या या आपणच निर्माण केलेल्या आहेत, त्या आपणच दूर केल्या पाहिजेत. आपण अनिष्ट चिंतन करतो, अनिष्ट इच्छा करतो, अनिष्ट बोलतो, अनिष्ट करीत असतो. आपण दुस-याबद्दल अनिष्ट बोलत असतो. चिंती परा ते येई घरा. तुम्ही इतरांबद्दल जे चिंतन करीत असता तेच तुम्हाला मिळत असते. शरीर ही खरी वास्तू आहे आणि त्यामध्ये तूच वास करून असतोस. त्यामुळे तू जे काही करीत असतोस त्याचे फळ बुमरँग होऊन तुलाच मिळत असते. प्रार्थना सतत म्हणत राहा आणि काय होते ते पाहा.
🙏 देवा सर्वांचं भलं कर 🙏
प्रत्येक कृती ही राष्ट्रहिताची,विश्वशांतीची.
ज्याप्रमाणे इच्छा धारण करतोस तसा तू
"Hi sanvai tatkal Soda"....ha Azcha vishay ahe .Thankuu Mauli. Dhanyavaad deva. Bless All 🙏💖
प्रार्थना सतत म्हणायची आहे
विचार किती इम्पॉर्टन्ट आहे त्याची ताकत काय आहे खुपच जबरदस्त मार्गदर्शन माऊली...... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
चिंती परा ते येई घरा ह्या म्हणीप्रमाणे दुसऱ्याचे वाईट केले तर आपले वाईट होते परंतु दुसऱ्याचे चांगले केले, भले केले की आपले चांगले होते, भले होते हे फक्त जीवनविद्या सांगते... अप्रतिम असे मार्गदर्शन.. धन्यवाद माऊली
सर्व प्रकरच्या समस्या ह्या मानवनिर्मित आहेत आणि म्हणूनच ह्यावर मानवानेच विचार करून त्या सोडवल्या पाहिजेत...
ATI Sundar margdarshan thank you Mauli 🙏♥️
Sadguru's guidance that we must make habit to ourselves for continuous शुभचितन and how we can do it? By chanting विश्वप्रार्थना which is greatest gift by our Sadguru, we will get everything if we pray every word from bottom of our Heart .
But tragedy is we don't understand it and are habitual of negative and harmful thought for others which are very destructive for overselves,why?'चिंती परा ते येई घरा'.So Sadguru gave this valuable msg that अशुभचिंतन तात्काळ सोडा,आणी शुभचिंतन करा, ह्यातच तुमचे भले आहे.
Thank You Sadguru.
Vittal vittal Pai Mauli 🙏🙏
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
जीवन विद्या सांगते तू हुशार हो ,ज्ञानी हो
Vittal vittal.karad. namaskar mauli.
जीवन यशस्वी कर ण्या साठी योग्य मार्गदर्शन. कृपया याचा स्वीकार करा. कोटी कोटी सद्गुरू राया. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌
कोटी कोटी धन्यवाद
Aajcya kadaci Garaj Jeevanavidy 🙏🙏🇮🇳
सर्वांना वदंन वदंन वदंन
*आजचा विचार* 🙏🏻 *वाईट सवय तात्काळ सोडायला हवी कारण, वास्तू नेहमी तथास्तु म्हणते असं आपण म्हणतो, त्याप्रमाणेच आपलं शरीर ही वास्तू आहे ज्यात आपण वास करतो! आता आपण जे विचार करू, बोलू, करू त्याला शरीररूपी वास्तू नेहमी तथास्तु म्हणते अर्थात जसा विचार तसा तू, जसा बोलशील तसा तू आणि जसा वागशील तसा तू.. तसातू तथास्तु!! थोडक्यात तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार कराल, बोलाल आणि वागाल तुमचं भलं होणारच... याउलट इतरांबद्दल अनिष्ट विचार कराल, बोलाल, वागाल तर... तथास्तु!!*
Thank you jeevanvidya
Koti koti pranam mauli
विट्ठल विट्ठल सद्गुरू माऊली कोटी कोटी प्रणाम देवा
Thank you Jeevan Vidya very good
# Jeevanavidy # Satguru Sri Wamanrava Pai # DADA Sri Pralahad Pai # Jeevanavidy #
Thanks Sadguru🙏🏻
Super positive thinking
शुभ चिंतन सुधारण्याचा सुंदर उपासना आहे
जीवनविद्या' ज्ञान' जीवन घडविण्याची युक्ती देते,शहाणपण देते . * आपलं जीवन घडण्यास किंवा बिघडण्यास आपले 'विचारच ' कारणीभूत 'आहेत. * जीवनात " कळत/नकळत अनिष्ट संस्कारातून आपल्याला अनिष्ट 'सवयी 'जडल्या आहेत, आणि त्याच आपल्याला "दुःखाच्या दरीकडे फरफटत नेत आहेत, म्हणून 'फक्त सवयी बदला, आणि जीवन बदलल्याचा अनुभव घ्याच . ही जीवनविद्या ज्ञानाची किमया आहे . Thanks to sdguru and jeevanvidya.
🙏
Vitthal Vitthal. Do the Constructive, Positive, Harmonious thinking is useful & necessary in our day to day life because Man is Creature of habit. As you think so you become.
अप्रतिम आहे सद्गुरूंचे मार्गदर्शन, खूप खूप थँक्स सदगुरु
🌹🙏🌹विठ्ठल विठ्ठल 🌹🙏🌹
विठ्ठल विठ्ठल माऊली
Aeese Satguru Hone Nahi Apratim pryaktikal Margdarshan Great Satguru Great jeevanavidy
दुसऱ्याच्या भल्याचा विचार केला की आपल भलच होत किती छान सांगितलं आहे 🙏🙏
धन्यवाद माऊली 🙏🙏
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल --सुंदर
सुखी होणे कसे सोपे याचे खुप सुंदर मार्गदर्शन 🙏🏼🙏🏼
खरी जी वास्तु आहे ती म्हंजे आपले शरीर आहे - श्री सदगुरुंच्या या दिव्य शिकवणीमुळे कित्येकांचे विचार उच्छार इच्छा आचार सुधारले आणि जीवनाचे कोट कल्याण झाले.
Thank you SATGURU!,🙏🙏🙏🙏
जय सदगुरू माऊली 🙏🙏🌹🌹
माऊली विठ्ठल विठ्ठल🙏
Thank you
चिंती परा ते येई घरा, मन चिंती ते वैरी न चिंती। यावर खूप छान explain केले आहे . उधारण पण खूप छान explain केले आहे. तुम्ही नेहमी दुसऱ्या चे भले चिंता तुमचे नेहमी चांगले होईल .अतिशय दिव्य मार्गदर्शन केले आहे.# thanks shree sadguru wamanrao pai
सर्व समस्या आपणच निर्माण करतो, तर ल्याचे निवारण आपणच करायला हवे. आपण सहज अनिष्ट चिंतन करतो, म्हणुन विचार बदला नशीब बदलेल, खरी वास्तू म्हणजे आपले शरीर आहे. अतिशय समृद्ध मार्गदर्शन खुप कृतज्ञता सदगुरू चरणी
🙏
आपल्याला अनिष्ट बोलण्याची....अनिष्ट करण्याची सवय झालीय.....बुवा बाबा तुम्हाला सांगतील तू उपासतापास कर,तू व्रत-वैकल्य कर....पण जीवनविद्या हे सांगत नाही...हित ते करावे देवाचे चिंतन....करूनिया मन एकवित.....प्रत्येकाला आपण सुखी व्हाव अस वाटत असत...म्हणून त्यासाठी म्हणा...देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच कल्याण कर...अत्यंत अद्भुत मार्गदर्शन माऊली धन्यवाद 🙏🌹🙏
🙏
प्रार्थना म्हणा आणि सहा महिन्यात काय अनुभव येतो ते पहा...... अप्रतिम मार्गदर्शन 🙏🏻thank you so much सद्गुरू 🙏🏻
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Je dusaryanch bhal kartat tyanch bhala hot, ani dusryanch vatol kel tr tyanch vatol hot. Yach satat smaran thevav. Thank you mauli😇
चिंतन चागले करा सर्व चागलच होईल.
आपण जे चिंतन करतो ते देव जवळ मागत असतो. आणि तेच देवाकडून आपल्याला मिळत असते म्हणून जीवनविद्या सांगते विचार बदला नशीब बदलेल.
खूप सुंदर मार्गदर्शन
Thank you dada
जे आपण चिंतन करतो तेच आपल्याला देव देत असतो .क्रिया तशी प्रतिक्रिया ह्या निसार नियम प्रमाणे आपण जे मागतो जी इच्छा करतो ते शंकर म्हणतो तथास्तु ह्या प्रमाणे होत असते.म्हणून सतत शुभ चिंतन,शुभ इच्छा शुभ बोलणे,शुभ करणे.सतत सर्वांचं चांगला विचार करा.असे सद्गुरू वामनराव पे आपल्याला सांगतात.Thank you 🙏🙏🌹🌹🙏🙏
🙏
विचार बदला नशीब बदलेल.
मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल.
आपले विचार नेहमीच विधायक असले पाहिजे.
माणूस सहज वाईट विचार करत असतो.
चींती परा ते येई घरा.हे नेहमी negative अर्थाने घेतले जाते .पण ही म्हण positive अर्थाने घेतली तर आपण दुसऱ्या बद्दल चांगला विचार केला तर चांगलेच आपल्या वाट्याला येईल.मन चिंती ते वैरी न चींती.
भाव तसा देव .जसा तुम्ही विचार करता तसा तू .
खरी वास्तू ही हे शरीर आहे.जे दुसऱ्यांचे भले करतात त्यांचे भलेच होते,वाटोळे केले तर वाटोळे च होणार.
आपल्याला अनिष्ट विचार करण्याची सवय झालेली आहे.त्यामुळे अरिष्ट आपल्या जीवनात घडत असते.
पै माऊली सांगतात तू ज्ञानी हो हुशार हो.चांगले चिंतन करा. चिंतनाने सर्व काही चांगलेच होऊ शकते.तुकाराम महाराज म्हणतात अवघे होती लाभ एका ह्या चींतने.म्हणून कायम ईश्वर आणि इश चिंतन च केले पाहिजे.
प्रत्येकाला मनापासून वाटते ना आपले भले व्हावे तर ते सर्वासाठी मागितले पाहिजे. विश्व प्रार्थना सतत बोलत राहा. सहा महिने प्रार्थना म्हणून बघा आणि काय होते ह्याचा अनुभव घ्या.पोटातून मनापासून प्रार्थना म्हणायला सुरुवात करा आणि चमत्कार अनुभवा.
तर करूयात सुरुवात रोज 1000 प्रार्थना म्हणायला.
" हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात ,आनंदात , ऐश्वर्यात ठेव,
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे."
जय सद्गुरु, दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐
🙏
ऐकून खूप खूप समाधान वाटलं ....
" Think good for others, think good for everybody. and you will be blessed by God. If you have doubt about this method then you should have to start from now to think good for others for maximum six month ; then you will be surprised by getting the result of the good thinking for others."🙏🏵️🙏🏵️🙏
Thanks Satguru Shri Vamanrav Pai . Thanks Jivan Vidhya . Org.
Best of Luck All.🙏🏵️🙏🏵️🙏🏵️🙏
Have a Happy Life.
🙏सतत प्रार्थना करण्याची सवय लावा त्यामुळे जीवनात काय परिवर्तन होते ते सांगतायत परमपूज्य सद्गुरु पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
जीवनात समस्या आपण निर्माण करतो नको ते विचार अनिष्ट चिंतन करता थाॅकयु धन्यवाद विठ्ठल विठ्ठल देवा कृतज्ञतापूर्वक वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🙏🙏
मी सुखी व्हा माझे भले वहा कल्याण वहा असे महणा की सर्वांचे कल्याण होदे
अनिष्ट बोलण्याची ,दुसऱ्यांची निंदा करण्याची सवय लागली आहे त्यातून आपल्याला बुमर्यांग होऊन तेच दुःख परत येते म्हणून ही सवय बदला असे सदगुरू श्री वामनराव pai सांगतात.
🙏
शरिर हि एक वास्तू आहे चांगले विचार शुभ चिंतन शुभ बोलने माऊली कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹
Vitthal Vitthal......
Chinti para te yaee ghara: two side of this
1. - Ve
2. + ve : Jeevanvidya philosophy shubha chintan
Jai Gurudev
Nice guidance mauli🙏🙏
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू कोटी कोटी प्रणाम हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे शंकर म्हणतो तथास्तु शंकर म्हणतो तथास्तु कोल्हापूर
छान
Tu dusryache bhal chintila tar tuze hi changle hoil
विचार बदला नशीब बदलेल- सुंदर
खुप सुंदर सद़गुरुच प़वचन🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sow Thought and reap action
Jai sadguru
Mi dusryache bhal karel tar maze bhal hoil