कोकणात आंदोलनं का होत नाहीत? B2B
Vložit
- čas přidán 8. 09. 2024
- कोकणातल्या सामाजिक मुद्द्यांवर बोलायला हवं. इथल्या प्रश्नांवर चर्चा व्हायला हव्यात. इथल्या संपन्नतेवर बोलायला हवं. कोकणातली वैशिष्टे, नैसर्गिक देण, नव्या मिळकती ह्यांवर उत्साही चर्चा व्हायला हवी. इथल्या कला-संस्कृतीवर भरभरून बोलायला हवं, कौतुक करायला हवं... आणि सामाजिक अडचणींवर उपाय शोधायला हवेत.. म्हणूनच आम्ही अगदी बेसिक पासून बोलायचं ठरवलंय.. त्यासाठीचा हा प्रयत्न Back to Basic; झो मुदातच! .. प्रतिक्रिया नक्की कळवा!
Sponsor: Vinod Waingankar-Hotel Waingankar
Production Team: Dipti Vahalkar, Shreya Jadhav, Manasi Pathare
Concept and Host: Pradeep Shivgan
Special Thanx:Rajendraprasad Masurkar
आर्थिक सहकार्यासाठी -
Gpay/Phone pay: 7559461646 (Kz creative)
Bank Details
A/c Name: Kz Creative
A/c: 12761100000115
Bank: Punjab and Sind Bank
IFSC: PSIB0021276
Branch: Shivaji Nagar, Ratnagiri.
#social #motivation #rural #public #interview #history
मसुरकर सरांचा अल्पपरिचय:👇
राजेंद्रप्रसाद सखाराम मसुरकर हे रत्नागिरी शहर परिसरात राहणारे एक ज्येष्ठ पत्रकार. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात जन्म आणि लहानपण गेल्यावर रत्नागिरी इथल्या 'आयटीआय'चा मोटार मेकॅनिक अभ्यासक्रमात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी पुण्याच्या 'बजाज ऑटो' कंपनीत नोकरी मिळवली. त्यानंतर पुणे विद्यापीठाचा पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण केला, याबरोबरच 'असोसिएट मेंबर ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स' अर्थात AMIME ही पदवी प्राप्त केली. इतिहास आणि राज्यशास्त्र हे विषय घेऊन टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एमए पूर्ण केलं.
पुण्याच्या 'संध्या' या दैनिकातून त्यांनी बातमीदारीचा प्रारंभ केला. त्यानंतर रत्नागिरीतील वेगवेगळ्या वृत्तपत्रांसाठी विपुल लेखन केलं. चाकोरीबाहेरच्या विषयांवरील बातम्या, जागतिक घडामोडींवरील स्तंभलेखन आणि राजकीय- सामाजिक - विषयांवरील रविवार पुरवणीतील लेखन या माध्यमातून त्यांनी समाजप्रबोधनाचं सातत्याने काम केलं. सर्वात उल्लेखनीय गोष्ट अशी की मोटारवाहन या विषयाला वाहिलेलं पहिलं मराठी मासिक 'मोटार जगत' या नांवाने त्यांनी १९९७ साली सुरू केलं. त्यातून मोटारगाड्यांबद्दल तांत्रिक आणि बाजारपेठेची माहिती देतानाच रस्ता सुरक्षा या विषयावर मोलाचं प्रबोधनकार्य त्यांनी केलंय. पुण्यात 'साने गुरुजी कथामाला' या संस्थेच्या माध्यमातून समाजकार्याचाही अनुभव त्यांच्या गाठीशी आला.
पत्रकारिता, इतिहास, राज्यशास्त्र यांपासून मोटार दुरुस्ती आणि ड्रायव्हिंगपर्यंत अनेक विषयांचे शिक्षक अशी मसुरकर सरांची एक ओळख आहे. आणखी एक ओळख म्हणजे ते लेखक आहेत. रत्नागिरीचे सुपुत्र आणि ख्यातनाम चरित्रकार धनंजय कीर यांचं चरित्र मसुरकर सरांनी लिहिलंय. विशेष म्हणजे मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी या चरित्राची स्वतंत्र पुस्तकं लिहिलीत. पत्रकारिता, सुरक्षित वाहतूक, इंग्रजी संभाषण कौशल्य या विषयांवरही त्यांनी सोप्या भाषेत अभ्यासपुस्तिका लिहिल्यात. 'राज्यघटना आणि नागरिक' या त्यांच्या अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मसुरकर सरांचं वैशिष्ट्य म्हणजे ते मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांतून ते सारख्याच सहजतेने लिहितात. धनंजय कीर यांनी लिहिलेल्या लोकमान्य टिळक चरित्राचा त्यांनी मराठीत अनुवाद केला आणि दत्तात्रेय अनंत आपटे यांनी लिहिलेल्या 'झोपाळ्यावरची गीता' या ओवीबद्ध पुस्तकाचं काव्यरूप इंग्रजी भाषांतर केलंय.
विविध विषयांवरची दोन हजार पुस्तकं आणि हजारो कात्रणं संग्रही ठेवणाऱ्या मसुरकर सरांनी कोंकणचा इतिहास, संस्कृती, कोंकण- विकास आणि समस्या याबद्दल भरपूर प्रासंगिक लेखन केलंय. आजच्या या मुलाखतीत कोंकणासंबंधी त्यांच्याकडून आपल्याला खूप मनोरंजक माहिती मिळेल.
मसुरकर सरांच्या मुलाखतीचे अजून भरपूर भाग व्हायला हवेत.अतिशय ज्ञानी आणि विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणजे मसुरकर सर.अनेक वर्षांपूर्वी आम्हांला जर्नालिझम शिकवायला सर होते. या मुलाखतीमुळे सरांना पाहण्याचे ऐकण्याचे भाग्य मिळाले.
😊
कोकण म्हणजे स्वर्ग आणि एकूण प्रगती मात्र शून्य.......शापित गंधर्वासारखी परिस्थिती...खरतर इथल्या मातीतल्या लोकांची इथल्याच लोकांना ओळख नाही. इतर जिल्हांना मसुरकर सरांसारखा माणूस मिळाला असता तर तिथल्या लोकांनी त्यांच्या ज्ञानाचा खरोखर उपयोग करून घेतला असता.
ह्याला कारणीभूत ही आपलीच लोक आहेत ना असे किती लोक आहेत जे प्रामाणिक पाने नेता निवडून देतात किती एकी आहे आपल्या कोकणातल्या माणसांमध्ये तेव्हा आणि आत्ताच्या परिस्थितीला हे माहिती असणं ही गरजेचं आहे ...
आम्हाला अजून माहिती ऐकायची आहे..मसुरकर सरांकडून.
मुलाखत पाहून आत्ता अस वाटत आहे की कोकणाबद्दल आम्हाला खूप कमी माहिती आहे... अजून माहिती ऐकायला आवडेल.
कोकण स्वर्ग होत आहे आणि पुढे ही राहणार
महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आदर्श अशे साहित्यिक , सामाजिक , देशभक्तीपर अशा महान रत्नाना कोकणभूमी ने जन्म दिला आहे .
मसुरकर सरांनी ह्या महान पण दुर्लक्षित भारत रत्नांची खूपच सुंदर माहिती दिली .
Thanks Kz Rangpat
कोकणात शरद पवार, जरांगे सारखे लोक रहात नाहीत म्हणून आंदोलनं होत नाहीत.
PERFECT. 😀
ऐक नंबर
सत्य हे शेवटी खर असत.
जरांगे तरी बरा पण पवार ....
कोकणत राने जे मराठी माणसाचे नाही
कोकणा संदर्भात पहिल्यांदाच इतकी प्रगल्भ माहिती ज्ञात झाली,मन:पूर्वक धन्यवाद.
अतिशय सुंदर मुलाखत आहे
नररत्नांच्या या खाणीत तसेच इतहासाच्या जडणघडणीत कोकणाचे अमूल्य योगदान आपल्यासारख्या जाणकार इतिहासाच्या अभ्यासकाकडून जाणून नेहमीच अभिमान वाटतो मसुरकर सर...❤ खूप उत्तम माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
खूप छान मुलाखत झाली ... आपल्या कोकणातील जेष्ठ आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून सन्मानीय मसुरकर सरांची एक ओळख संपूर्ण जनतेपर्यंत पोहोचेल यात शंकाच नाही. भविष्यात नक्की सरांचा वेळ घेऊन भेटू.
"भूमि स्वर्ग हो, मनुष्य देवता हो,धर्म सफल हो, नित्य शुभ हो। "___ए.नागराज जी (प्रणेता:-मध्यस्थ दर्शन) सह-अस्तित्ववाद😊🙏
छान मुलाखत!
मसुरकर साहेब हेच स्वतः कोकण रत्न आहेत. मला यांच्याबद्दल आधी माहीत नव्हते, याची खंत वाटते.
लवकरच पुन्हा ऐकण्याची संधी द्यावी, ही विनंती 🙏🚩🙂
आदरणीय मसूरकर सर कोकणातील आहेत.. हे आम्हां कोकणवासीयांचे भाग्य.. खूप मोठे कार्य आहे सरांचे 🙏
अगदी!❤️❤️
जमिनी विकून चैनी करण्याची सवय लागली आहे कोकणातल्या लोकांना
आपल्याला धन्यवाद,कोकणचा चालता बोलता इतिहास जगासमोर आणलया बद्दल.
रत्नागिरी जिल्हा देशाच्या स्वातंत्र्य लढायात व समजा सुधारण्यात मोठे योगदान आहे परंतू सध्याचे पुढारी हे आप मतलबी झाल्याने कोकणlतून पैसा लुटायचा भाग बनला आहे
कोणत्या प्रकारची समाज सुधारणा ? खरंच समाज सुध्रलेला आहे का ?
Ratnagiri zhilyatil kahi nete va samaj sudharak swatantraladhyat hote...
Pan te Pune , Mumbai,satara ,kolhapur madhun Kam karat hote...Karan lok samarthan tithun milat hote ...koknatun nahi...
@@amitpawar6247 सावरकरांनी पतितपावन मंदिर कुठे बांधले ते तरी सांगा पूर्ण रत्नागिरी जिल्हात आता सुद्धा सुख सोयी नाहीत पण त्या वेळी कुठे असणार पण हिथें जन्मा आलेले ते देशा साठी अनेक ठिकाणी गेले म्हणजे त्यांना सपोर्ट नव्हता असे नाही पुणे मुबई त्या काळी सुद्धा सुख सोयी नी समृध्द होती आणि त्याचे विचार एक क्रांती होती मग बाहेर पडले तर काय झाले.
मसुरकर साहेबांनी खुप उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल त्यांचे आभार , दुसरा भाग सादर करून आणखीन आमच्या ज्ञानात भर पाडवी हि आपणांस नम्र विनंती .
मसुरकर सरांनी दिलेली माहिती खूपच छान मनाला भावली खूप छान
खूप छान झाली मुलाखत ...आपल्याच माणसांची आपल्याला ओळोख नसते हेच आपलं दुर्देव
लाख मोलाची माहिती 🙏🙏
आदरणीय मसूरकर सरांनी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे 🙏
🙏 तुमच्या संपूर्ण संघाचे मन: पूर्वक शुभेच्छा!!! 💐
तुम्ही अत्यंत महत्त्वाच्या अश्या "आपल्या कोकणा" बद्दल अमूल्य माहिती आमच्या पर्यंत पोहोचवली.
छान मुलाखत ! चांगली माहीती मिळाली ! माझं कोकण आहेच तसा नररत्नांची खाण असलेलं ! त्यात हे मसुरकररुपी खासकरून कोकणची माहिती देणारं व्यक्तीमत्व अर्थात कोकणरत्न समोर आलं त्यामुळे त्यांच अभिनंदन आणि धन्यवाद ! तसेच ही माहिती आणि व्यक्ती आपण सर्वांसमोर आणलीत उत्तम मुलाखत घेतलीत त्याबद्दल मुलाखतकार आपलेही अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद !
नमस्कार मसुरकर दादा
उत्तम मुलाखत , चांगली माहिती मिळाली .
धन्यवाद
ही मुलाखत आणखी मोठी हवी होती! भाग -२ करा प्लीज! खरं तर अनेक भाग करता येतील..! राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे लेख वाचायचो पेपरमधले.. बऱ्याच वर्षांनी नाव ऐकलं..!
शुभेच्छा..!!! 🎉❤
अतिशय उत्तम मुलाखत
धन्यवाद साहेब.अतिशयस छान माहिती मिळाली
On occasion of Gurupoornima worth listening..
सध्या. 6.30 वा पूर्ण भाग नक्की बघा
छान माहिती दिलीत मसूरकरसाहेब.......आपण तर साहित्यिक आहात. जनतेच्या मनातील आदरणीय स्थांन.कोकनच्या भरभराटिसाठी कोकणातील स्थानिक समाजसेवी संस्थानि वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले पाहिजे......
नाहीतर काही दिवसानी,महिन्यानी,वर्षानी परप्रांतीय कोकनचा गळा घोटतील....
He is very knowledgeable so have a second session. Please.
छान मुलाखत, सलाम तुम्हाला,आपण सुध्दा कोकणासाठी रत्न आहात.
राजेंद्र प्रसाद मसुरकर हे फार उत्तम वक्ते आहेत. माझ्या त्या ना फार फार मनापासून शुभेच्छा अनंत सुर्वे खेर्डी चिपळूण
सुंदर माहिती दिली आहे. मसुरकर सरांना अभिवादन!
खूप छान मुलाखत घेतली आणि खूप छान माहिती मिळाली❤❤
🙏🙏👍
Ek number episode banavlaa ani Khup chaan ani ek number ani Koti molachi mahiti milali
मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा आणि आपल्या जवळच्यांना हा भाग Whatsapp ला नक्की शेअर करून मदत करा... ❤️❤️🙏🏻🙏🏻
अप्रतिम 🙏🏻🙏🏻
nice imformative video
काथ्या प्रकल्प सुरू करण्याचा मी स्वतः प्रयत्न केला. बना कॉयर असे नाव होते. वर्षभर चालला, नंतर कामगार मिळू शकले नाही आणि आतां लघु उद्योग म्हणून सुरू केला तो बंद पडला. आपला अभ्यास जबरदस्त आहे.
@@iqbalmukadam9877 भय्या नेपाळी ठेवायचे. लोकल पळून जातो. आणि काम पण करत नाही.
खूप खूप धन्यवाद साहेब आपल्यामुळे आम्हाला सगळे माहिती मिळते❤❤
मनःपूर्वक आभार!...हा नवीन प्रयत्न करतो आहोत. असेच सोबत राहा नक्की शेअर करा
मसुरकर सर ,हे साहित्य आणि इतिहासाचे खरे अभ्यासक आहेत
छान मुलाखत झाली, राजेंद्र मसुरकर माझे बालपणी चे मित्र आहेत.धन्यवाद.
कोण म्हणत कोकणात आंदोलनं होत नाहीत, रिफायनरी प्रकल्प रद्द करा म्हणून जे आंदोलने केली ती काय होती म..?
Lawdya baki muddyavar andolan ka ny hot, refinery virodh fakt political ahe lokanna ky zata kalto refinery cha
Uttam Maheti Deli
Second part Jarur
Khup chhan mahiti dili
छान
खूप छान वाटले संभाषण ऐकून 🎉
खूप सुंदर मुलाखत. माहित नसलेली खूप छान माहिती मिळाली. मनस्वी धन्यवाद 💐🙏🏻
आमचं कोंकण आमची रत्नागिरी ❤🤗
मनःपूर्वक धन्यवाद!... नक्की शेअर करा
छान.
फारच छान....
खूप सुंदर मुलाखत खूप सुंदर माहिती लढाई राजेंद्र मसुरकर हे आमचे मित्रच आहे याबद्दल खूप समाधान वाटतं अशीच माहिती वेळोवेळी जगासमोर मनाली आपणाला शुभेच्छा आणि धन्यवाद
मनःपूर्वक आभार सर!... हा video नक्की share करा!... अधाकाधीक लोकांपर्यंत पोहोचायला मदत करा
खूपच छान सविस्तर माहिती मिळाली.
Masurkar sir 👍 hats off
अप्रतिम
कोकणात देखील आंदोलने होतील जेव्हा परप्रांतीयांची दुकाने, हॉटेल, व्यवसाय, वसाहतीत मोठ्या प्रमाणात वाढतील.........
काही वर्षांनी तेही होईल, कारण आताही तिथे परप्रांतीय राहतात
अजून काय वाढायची राहिलीत?
@kishorthakur1645 खरय
कोकणची माणस साधी भोळी 😊
⁷@@loveyourself-fe5rt
अतीशय सुंदर व्हिडीओ आहे.
Very good information
👍🙏
best think
Nice
खूप खूप छान शुभेच्छा
Thanks🌹
Kokan manus laya bhari
Chan
अतिशय महत्वाची अभ्यासपूर्ण माहिती दिली सरांनी.
मसूरकर सर कुठे असतात. त्यांची भेट हवी असेल तर संपर्क कसा करावा.
Va chan
NICE VIDEO
पण सर्वांना कोकणातून बाहेर पडल्यावर यश मिळाले.
Karan kokanatle lok koknat manasala moth hou details nahi, zundshahi karun mothya honarya manasala sapwun taktat
आता अस नाही कारण कोकणात शाळेकरी मुले व वयस्कर मंडळी आहेत,,असेच up , बिहारी मोठे नाही झाले,,,माझ्या माहितीनुसार जे मोठे झाले ते घाटावरील आहेत,,,
@@sahadevpatil2188 शाळकरी मुले म्हणजे ३० च्या वर पूर्ण शाळेचा पट जात नाही ती मोजतोय का तू🤣🤣🤣
प्रदीप सर, खूप छान मुलाखत घेतली, मसुरकर सरांचा अभ्यास आणि त्यांचे भाषेवर च प्रभुत्त्व यामुळे ज्ञानात नक्कीच भर पडली.
मनःपूर्वक धन्यवाद
राजापुरकर🔥❤️
विलास भिकाजी ऊ
राजापूर
मसुरकर सर अगदी बरोबर आहे
Kokan is ❤. जगामधे जसा भारत आहे, भारतामधे जसा महाराष्ट्र आहे तसा महाराष्ट्रा मध्ये कोकण आहे
खुप छान 👌👌👌
मनःपूर्वक आभार!...हा नवीन एपिसोड्स आहेत. सर्वांपर्यंत पोहोचवायला नक्की सहकार्य करा .. शेअर करा
लोटे,midc मध्ये केमिकल कारखाने आले,आणि पर्यावरण दूषित झाले.
@@vijaybhosle3850 साहेब चंद्राबाबू नायडू नी एक हजार कोटीचा प्रकल्प आपल्या राज्यात मेला देखील. तीन जागा पैकी एका जागेत ती रिफायनरी होणार आहे. तिकडे देखील मासेमारी होते. मच्छीमारांनी कुठलाही विरोध केला नाही. आपल्याकडे विरोध होतो आणि प्रकल्प पळवल्याचा ओरडा होतो. कोकणात आता जास्त करून म्हातारा म्हातारी आणि जी तरुण मुले त्यातील बरीचशी राजकारणात.
मसुरकर सरा कडून आणखी माहिती ऐकायला खूप आनंद होतो कारण कोकणा विषयी खुप थोड्या लोकांना माहिती अजुन पोहचली नाही खुप धनयवाद सर
नोकऱ्या मिळाल्या, भरल्या पोटावरून हात फिरवीत दूषणे देताय ❓❓❓❓❓
काय करणार? प्रदूषणे मिळाल्यावर दूषणेच देणार. केमिकल कारखाने कोकणात तर बाकीचे बारामतीत ही नीति महाराष्ट्रात राबवली गेली हे सतत्य आहे
मसुरकर सर यांची मुलाखत खूप छान....असेच उत्तम विचारवंतांना भेटा......आम्हाला.....त्याचा आनंद आहे.
कोकणाने मोठी माणसे दिली पण कोकण तसाच राहिला असा प्रश्न आपण विचारला...माझे कायम निरीक्षण राहिले आहे...बाळाजी विश्वनाथ, आंबेडकर, टिळक यांच्यापासून तीनही भारतरत्नांपर्यंत सर्व कोकण सोडुन बाहेर/घाटावर गेल्यानंतर मोठे झाले...विचार करा...पण या भूमीचे महत्व त्यामुळेच खुप मोठे...खुप छान व नवीनही माहिती मिळाली...keep going..back to basic.
अगदी!... ह्यावर चर्चा व्हायला हवी एकदा... आभार
Kokan hi parashuram chi bhumi ahe falatugiri la mahatva denar nahi devache nav gheun kam karanari ahe
आमच्या कोकणात जरी माणसे बाहेर जाऊन मोठी झाली तरी मूळ ती सर्व कोकणातील च आहेत. कोकण नुसतं निसर्ग संपन्न च नाही, तर या भूमीने भारत रत्न दिली आहेत. शिक्षण, करियर कुठे ही होवो, पण मूळ गाव, घराणे गावाशीच जोडून असते. मुंबई, ठाणे हे पण कोकणाचा भाग आहेत, म्हणून च मुंबईला पण समुद्र आहे.
Barobar
❤❤❤❤मसुरकर सर
तुम्हा दोघांचे खूप खूप आभार पुढचा भागाची आतुरतेने वाट पाहत आहोत👌👍🙏🌹
आजच सायं. 7.00 पर्यंत नवीन भाग प्रदर्शित होणार आहे
khupp chann sir
सचिन तेंडूलकर मोठा माणूस पण कोकणासाठी त्याचे योगदान कुठे आहे बगा
कोकणातच काम करतात. राजकारण्यांचासारखा गवगवा नाही
काय संबंध? सचिन चे शिक्षण, करिअर मुंबईत झालं.. त्याच्याकडून का म्हणून अपेक्षा ठेवावी?
Dada tune samurn gaon Dattani ghetle aahe ,Rahul Dravid ne hey spsht kele aahe ,😅😅
सचिन तेंडुलकर चे मुळ गाव हर्चे गावातिल तेंडुलकर नेहमी निनावे मदत करत असतो त्याचा तो गवगवा नाही करत
@@pandurangwaingankar7352 bachu kadu sarkhe black mail karu naka ,Sachin Tendulkar cha Trust aahe ,tya dvare te madat karat astat ,phooka ,phookat 😆😆😆😆
दादासाहेब तोरणे वेंगुर्ल्याचे.
अभिमान आहे कोकणाने भारतभूमी ला अनेक कोकणरत्न दिले.
चरी संप 1932 ते 1939 या कालखंडात झाला. चरी हे गाव रायगड जिल्यातील अलिबाग तालुक्यात आहे.
होऊन गेलेले सर्व महा कोकणस्थ लोकांचा बाबतीत दिलेले ज्ञान उत्तम च आहे । पण ह्यात कोंकणात काय बदल झाले बहुतेक लोक मुंबईला येऊन आपली करकीर्दी बनवले, जाऊ द्या कंटाळा येतो । पुढे नाही लिहीत ।
कोकणात कुठले उद्योग धंदे यावेत किंवा कधी उद्योग धंदे येऊ नयेत याबद्दल स्थानिक जनता ठरवते की राजकारणी ठरवतात?
Rajkarani te pan ekadache sthanik nasalele.
कोकणातील नेत्यांनी पर्यटन,मंदिरे, रिसॉर्ट,पार्क उभारून प्रचंड पडणाऱ्या पाऊसाचा उपयोग करावा त्यातून खूप उद्योग रोजगार उभे राहतील ,जिथे लोकवस्ती नाही तिथे उद्योग उभारायला हरकत नाही कारण एवढे पाऊसाचे पाणी महाराष्ट्र कुठेच नाही
11:01 आता Raigad ही राजधानी का नाही? कारण ते सोईस्कर नाही. त्याच प्रमाणे पेशवे काळी गडाची गरज राजधानी म्हणून सोईस्कर नव्हती. छत्रपती सुद्धा सातारा ला स्थायिक झाले.
छत्रपती शिवाजी महाराज कोकणातले नव्हते पुण्याचे होते.
साने गुरुजी कोकणातले .
नव्हते
Madhuri Dixit pan konkan chi ahet
मनोहर सुर्वे यांच्यावर एक मुलाखत घ्यावी.
Kokani manus sadha samadhani aahe.....titkach krantikari suddha...
अशीच आणखी एक मुलाखत आयोजित करा, आमच्या ज्ञानात भर होउ दे
नक्कीच... लवकरच करतो आहोत
सरांनी दिलेल्या माहितीत महत्त्वाची त्रुटी राहून गेली .ती म्हणजे सावरकरांनी बांधलेले सर्व धर्मीय पतीत पावन मंदिर
पतित पावन मंदिर श्रीमान भागोजीशेठ कीर यांनी बांधले होते.. सावरकरांनी अस्पृश्यांसाठी ते खुले केले.
छान मुलाखत. कोकण संबंधित महत्वाची माहिती ऐकायला मिळाली. मा.मसुरकरसरांना मी ओळखतो. त्यांच्या घरी विविध विषयांवरील भरपूर पुस्तके आहेत.दांडगा अभ्यास आहे.आपण विविध विषयांवरील त्यांच्या आणखीन मुलाखती घ्याव्यात.हि विनंती.
उद्या संध्याकाळीच एक नवीन भाग येतो आहे.. नक्की बघा
कोकणामधे कुटल्याही प्रकलपाला स्थानिकांचा विरोध असता तर आपल्या जमिनी विकल्या नसत्या आणि हे असले प्रस्ताव मांडण्या पेक्षा ज्यांनी जमिनी का विकल्या हे प्रत्यक्ष पहावे
Phar chan vatala me kokankar Jay maharashtra ⚘️🌹🇳🇪🚩🙏
Amha kokani manasanchi manpana mule pragati zali nahi andolan, chalvali kel tari manpana mule yashaswi hot nahi
I work in gulf as u all aware that oil will be vanish in coming 30 yrs so alternative source of income gulf gov is promoting and planning tourism as main source of income
Now note 1 thing here they are developing artificial forest bringing animals birds so they can attract foreigner
Now i want to ask do kokan need this? No we have it naturally and trust me if we give them facilities foreigner will come in kokan
Thanks for sharing these thoughts..
You are right. For sustained development of this lovely region we all should strive to bring here the industry which will not destroy the natural resources. A very need to do that is the public involvement. Today we are accepting what our leaders are giving, our resistance to proposed projects may be admitted, but why don't we oppose unwanted road widening projects? What we do to gain higher posts in administration? Why don't we cultivate our farms? There are several examples of successful farmers in Konkan. You have mentioned tourism. This sector hold a huge potential, but our tourism conept has not crossed the roads towards a handful pilgrim spots and two or three beaches. We have excellent delicious dishes but we could not aquire railway stalls. We had our Konkani person as Railway Minister, he did not utilized his power for opening the doors of food stalls to Konkani items, he could have, but he wasted his energy in supplying water by railway to another district. We all shoul come up and walk with hands in hands.
गर्वसे. कहो हम कोकणी है ! !
सर आपण मसुरकर सरांची मुलाखत हेऊन आम्हाला खुप माहित दिलीत, धन्यवाद
मनःपूर्वक धन्यवाद
Kokan maza swargahun Sundar aahe.